मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात (राणीची बाग) गेल्या तीन – चार वर्षांत एकही नवीन प्राणी आणलेला नाही. प्राणी आणण्यासाठी केलेली तरतुदही वाया गेली आहे. झेब्रा, आशियाई सिंह आणण्याचे पालिकेचे प्रयत्न तोकडे पडले आहेत. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे्. या प्रकल्पांतर्गत वाघ, बिबट्या, तरस, देशी अस्वल, पक्षी पिंजरा-१, कोल्हा, बाराशिंगा, चितळ, सांबर, आशियाई सिंह या प्राण्यांकरीता पिंजरे बांधून पूर्ण झाले आहेत. परदेशातून वा परराज्यातून आणलेले प्राणी काही पिंजऱ्यांमध्ये ठेवण्यात आले आहेत. आशियाई सिंह आणण्यासाठी पालिकेचे गेल्या दोन – अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र गेल्या चार वर्षांत एकही नवीन प्राणी आणण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. माहिती अधिकारात ही बाब प्रशासनाने मान्य केली आहे. सामाजिक कार्यकर्ते पिमेंटा गॉडफ्रे यांनी पालिका प्रशासनाकडे माहिती अधिकारात याबाबत माहिती मागविली होती. त्यामुळे गेल्या चार वर्षांतील सुमारे साडेसहा कोटींची तरतुदही वाया गेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा