मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी, तसेच मतदारांना मार्गदर्शन करणे, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवर सहकार्य करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये एनएसएस, एनसीसी, स्काऊट, आरएसपी आणि इतर इच्छुक विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.

निवडणुकीच्या कामासाठी विविध सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. आता मतदान केंद्रावर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना मदत करण्यासांठी १८ वर्षांखालील म्हणजेच एनएसएस, एनसीसी, स्काऊट, आरएसपी आणि इतर इच्छुक विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षक निरीक्षक कार्यालयाने मुंबईतील सर्व मान्यताप्राप्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालये यांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच मतदारांना मदत करण्यासाठी इयत्ता नववी ते १२ वीमधील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांची नावे व संबधित विषयाचे शिक्षक यांची नावे सादर करण्याचे आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयाने दिले आहेत.

prahar association protest in front of collectors office for various demands of disabled
नाशिक : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे आंदोलन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Political parties organising religious event ahead of assembly poll to attract voters in Mira road
मीरा भाईंदरमध्ये राजकारण्यांची धार्मिक चढाओढ
Constituencies in Nashik Division Delicate'for Grand Alliance
नाशिक विभागातीलं १६ मतदारसंघ महायुतीसाठी ‘नाजूक’ ; भाजपचा अभ्यासातील निष्कर्ष
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
MHADAs Mumbai Board of Housing applications deadline extended by 12 hours
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांचे अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्ज भरण्यासाठीची मुदत १२ तासांनी वाढवली
CID , MIDC, Konkan, Bal mane, Uday Samant,
कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा, बाळ मानेंची मागणी; उदय सामंत यांच्या खात्यावर आरोप
sharad pawar
शरद पवारांचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; सरकारला इशारा देत म्हणाले…

हेही वाचा : ‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

विद्यार्थ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळा

मुंबईसह राज्यात एप्रिल-मे महिन्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. उष्माघातामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना निवडणुकीच्या कामातून वगळावे, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहे.