मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे वसाहतीमधील कारशेडच्या बांधकामामुळे आरे वसाहत आणि अंधेरी पूर्वेला जोडणाऱ्या मरोळ – मरोशी रस्त्यावरील परिसर, तसेच आरे आणि पवईला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी साचत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पाणी जिथे साचते ते ठिकाण आरेतील कारशेडपासून खूप लांब आहे, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील (एमएमआरसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

आरे वसाहतीचा रस्ता आणि कारशेडची जागा दोन्ही सखल भागात आहेत. कारशेड बांधण्यासाठी ३३ हेक्टर क्षेत्रात जमीनभरावाची कामे करण्यात आली आहेत. तसेच कारशेडच्या हद्दीत एक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून हा प्रवाह एमएमआरसीएलने वळवल्याने गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता पाण्याखाली जात असल्याचा आरोप ‘सेव्ह आरे’च्या अमरिता भट्टाचार्य यांनी केला आहे.

fog on railway track
कल्याण: दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल अर्धा तास उशिरा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Shiv-Panvel highway, Shiv-Panvel highway potholes ,
मुंबई : शीव-पनवेल महामार्ग खड्ड्यांतच
Badlapur citys only flyover again had large number of potholes
गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच, बदलापुरचा उड्डाणपुल पुन्हा खड्ड्यात; जोड रस्ते, चौकही कोंडीत
Uran Panvel road work
जासई शंकर मंदिर उभारणीसाठी ठोस निर्णय हवा, जेएनपीए प्रशासनाकडे जासई ग्रामस्थांची मागणी
Repair of potholes, Uran-Panvel road,
उरण-पनवेल मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताने नागरिकांना दिलासा
Pune Metro, Yerawada Station, Mahametro, train frequency, passenger services, Pimpri Chinchwad, District Court, Vanaz, Ramwadi,
पुणेकरांना खुशखबर! मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ; प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी
Canal form in Nashik to flyover on Mumbai-Agra highway
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास नाशिकमध्ये कालव्याचे स्वरुप, तोडगा कसा निघणार?

हेही वाचा : मुंबई: अल्पावधीतच टी १ उड्डाणपूल खड्डेमय, कंत्राटदार आणि प्रकल्प सल्लागारास एमएमआरडीएची नोटीस, दंडही ठोठावताच खड्डे दुरुस्ती पूर्ण

दरम्यान, पावसाळ्यात पवई आणि मरोळहून आरेकडे जाणारे दोन्ही मार्ग मुसळधार पावसामुळे जलमय होत आहेत. आरेतील रहिवाशांना पवई आणि सीप्झ येथे कामावर आणि बाजारात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, या प्रकल्पामुळे आरेतील आदिवासी पाड्यातील नागरिकांच्या घरांवर तसेच उपजीविकेवरही परिणाम होत आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.