मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत ७ टक्क्यांनी प्रवासी वाढले. दुसऱ्या तिमाहीत मुंबई विमानतळावरून एकूण १.३४ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. ज्यामध्ये ३७ लाख आंतरराष्ट्रीय आणि ९७ लाख देशांतर्गत प्रवाशांनी प्रवास केला.

मुंबई विमानतळावरून दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला एप्रिल महिन्यात ४३ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मे महिन्यात यात वाढ होऊन ४७ लाख प्रवाशांनी प्रवास केला. तर, १८ मे रोजी सर्वाधिक म्हणजे एक लाख ६३ हजार १६६ प्रवाशांनी प्रवास केला. तर, जूनमध्ये ४३.९ लाख प्रवाशांनी प्रवास केला. मुंबई विमानतळावरून दुसऱ्या तिमाहीत एकूण ५९ हजार ७७५ देशांतर्गत आणि २१ हजार ५१९ आंतरराष्ट्रीय विमानाची वाहतूक झाली. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

Air india sale namaste world sale for domestic from 1499 and international flights know how to book tickets google trends
आता विमान प्रवास करा फक्त १,४९९ रुपयांत! AIR India देतेय खास ऑफर, जाणून घ्या कशी करायची फ्लाइट तिकीट बुक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद शिरसाट यांच्या पत्नी तेव्हा विमानातच होत्या, पण नेमकं घडलं काय? प्रश्न अनुत्तरीतच!
ST hiked passenger fares by around 15 percent now avdel tethe Pravas pass fares also increased from 45 to 66 percent
‘एसटी’च्या ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेला प्रवासी मिळणार कसे?.. पासच्या किमती…
11869 flights landed at nagpur international airport in 2024
बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ उपराजधानीत १२ महिन्यात ११ हजार ८६९ विमाने उतरली
Mahakumbh, Airline companies , fares ,
‘महाकुंभ’साठीच्या दर ‘भरारी’चे नियंत्रण करण्याची मागणी, विमान कंपन्यांच्या भाडेवाढीविरुद्ध ग्राहक पंचायत आक्रमक
Pune Prayagraj Air Flight , Pune Prayagraj ,
पुणे प्रयगराज हवाई उड्डाण थेट नाहीच, प्रवाशांची नाराजी
Mahakumbh Mela 2025 Flights Rates
Maha Kumbh 2025 : महाकुंभला जाण्यासाठी विमान तिकिटे स्वस्त होणार? उड्डाण मंत्रालयाची पावले; विमान कंपन्यांना दिल्या सूचना!

हेही वाचा : प्रशिक्षण थांबवून पूजा खेडकर यांची मसुरीला पाठवणी

मुंबई विमानतळावरून दिल्ली, बंगलोर आणि हैदराबाद येथील प्रवाशांनी सर्वाधिक प्रवास केला. ६९ लाखांहून अधिक प्रवासी विमानतळावरून प्रवास करीत असलेली देशांतर्गत प्रमुख तीन ठिकाणे म्हणून उदयास आली आहेत. तर, दुबई, सिंगापूर आणि लंडन यांनी सर्वोच्च तीन पसंतीची आंतरराष्ट्रीय गंतव्ये म्हणून त्यांचा दर्जा कायम राखला आहे. या तिमाहीत ६ लाखांहून अधिक प्रवाशांनी मुंबई – दुबई प्रवास केला. तर, इंडिगो, एअर इंडिया आणि विस्तारा या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक बाजारपेठेचा वाटा असलेल्या सर्वोच्च विमान कंपन्या म्हणून उदयास आल्या. यंदाच्या तिमाहीत एकूण ४९.९ लाख म्हणजे ५० टक्के प्रवाशांनी इंडिगो विमान कंपनीच्या विमानामधून प्रवास केला.

Story img Loader