मुंबई : मुंबईत शुक्रवारी ३२.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. असे असले तरीही मुंबईकरांना शुक्रवारी असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. तापमानाचा पारा कमी असतानाही पारा चढा असल्यासारखे वाटत होते. दरम्यान, पुढील एक- दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३० अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवरील तापमान सरासरी इतकेच असतानाही वाढलेल्या आर्द्रतेमुळे शुक्रवारी उकाड्याचा सामना करावा लागला. दरम्यान, उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारवा निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली होती. मात्र, शुक्रवारी राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात घट झाली असून पुढील एक – दोन दिवसांत यात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
maharashtra recorded 33 to 35 degrees celsius maximumtemperature
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा; जाणून घ्या, कमाल तापमान का वाढले
Garbage collection charges mumbai loksatta news
BMC Budget 2025: मुंबईकरांवर कचरा संकलन शुल्क, कायदेशीर सल्ला घेणार
mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात
Environmental clearance from the state itself revised notification issued by the central government Mumbai news
राज्यातूनच पर्यावरणविषयक परवानगी, केंद्र सरकारकडून सुधारित अधिसूचना जारी; गृहप्रकल्पांना दिलासा
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
daily passengers traffic jam Shilphata route five day road work
शिळफाटा मार्गावर कोंडित अडकायची आम्हाला सवय, आता तर पाच दिवस सुट्टी घेऊ… प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया

हेही वाचा : वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा

राज्यात काही भागात शनिवारी हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, नाशिक, परभणी, बीड, अहिल्यानगर आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित भागात दिवसभर ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

Story img Loader