कुलदीप घायवट

मुंबई : लोकलमधील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने शून्य मृत्यू मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबई महानगरातील संस्थांना कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेला सर्वप्रथम सकारात्मक प्रतिसाद मुंबईतील मुख्य पोस्ट मास्तर कार्यालयाने दिला. नोव्हेंबर २०२३ मध्ये कामाकाजाच्या वेळा बदलण्याचा निर्णय टपाल कार्यालयाने घेतला. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. टपाल कार्यालयातील ११५ पैकी ६९ अधिकारी, कर्मचारी हे मध्य रेल्वेवरून येत असल्याने, त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केला जाईल. त्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ ठराविक चौकटीतील कामाची वेळ लवकरच बदलणार आहे.

Separate compartment, senior citizens,
दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा, एका मालडब्याचे ज्येष्ठांसाठीच्या डब्यात रूपांतर, रेल्वे प्रशासनाची उच्च न्यायालयाला माहिती
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य
Contractors are going to be charged twice as much for the deteriorated road repair work in Pimpri
पिंपरीतील रस्तेदुरुस्तीची निकृष्ट कामे; ठेकेदारांवर…!
woman hair salon operator file case against shop owner for threatening in dombivli
डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा नियमबाह्य ताबा घेणाऱ्या गाळे मालकाविरुध्द गुन्हा
incomplete work of first phase of concreting road complete by may 2025
सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मे २०२५ ची मुदत; कामे पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
Offense against municipal employee refusing to sign Panchnama
पिंपरी : पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास नकार देणार्‍या महापालिका कर्मचार्‍यावर गुन्हा

लोकलमधील प्रवाशांचा गर्दीचा भार ठराविक वेळेत अधिक असल्याने, रेल्वे प्रवासात प्रवाशांचा हकनाक जीव जातो. त्यामुळे लोकलमधील गर्दीचे विभाजन आणि रेल्वे प्रवाशांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी मध्य रेल्वेने ‘शून्य मृत्यू’ मोहीम राबवण्यात येत आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये मध्य रेल्वेने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळा बदलून, दोन पाळ्यांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मध्य रेल्वेने मुंबईतील ५०० संस्थांना कार्यालयीन वेळा बदलण्याचे निवेदन पाठवले. यावेळी सर्वप्रथम मुंबईतील टपाल मुख्यालयानेही (जीपीओ) कामकाजाच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा… कन्नमवार नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग १७ वर्षांनी मोकळा!

मुंबई उत्तर विभागात ३६, मुंबई दक्षिण विभागात २७, मुंबई पूर्व विभागात ३६, मुंबई पश्चिम विभागात ४४, मुंबई उत्तर पश्चिम विभागात ३३, मुंबई जीपीओत एक, मुंबई उत्तर पूर्व विभागात ५३, ठाणे विभाग १९९ आणि नवी मुंबई विभागात १३३ टपाल कार्यालये आहेत. अशी मुंबई महानगरात ५६२ टपाल कार्यालये आहेत. या कार्यालयांतील कर्मचारी सकाळी ८ ते दुपारी ४, सकाळी ९ ते सायंकाळी ५, सकाळी १० ते सायंकाळी ६ अशा तीन पाळ्यांमध्ये काम करतात. विविध कामांच्या पूर्वनियोजनासाठी या तीन पाळ्यांमधील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेच्या एक तास आधी येणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केला जाणार नाही, असे टपाल कार्यालयातून सांगण्यात आले.

हेही वाचा… बोरिवलीच्या श्रीकृष्णनगर पुलाला वन विभागाची परवानगी; लवकरच पुढच्या टप्प्याचे काम सुरू होणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगत असलेल्या टपाल कार्यालयात ११५ अधिकारी, कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. ११५ कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ६९ कर्मचारी मध्य रेल्वे स्थानकाच्या जवळ राहत असून, मध्य रेल्वेच्या लोकलने प्रवास करतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत होण्यासाठी टपाल कार्यालयातून हालचाली सुरू झाल्या आहेत. दैनंदिन कामकाज आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देऊन या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केला जात आहे, असे टपाल कार्यालयातून सांगितले आहे.