मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच मुंबई पारबंदर प्रकल्प (MTHL) (शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतू) पूर्ण झाला असून आज (दि. १२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. मुंबईतील शिवडी येथून सुरू होणारा आणि नवी मुंबईतील चिर्ले येथे संपणारा अटल सेतू २१.८० किमी लांबीचा आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्प साकारला आहे. या मार्गावरून बस सेवा सुरू होणार का? याबाबत मुंबई, नवी मुंबईतील नागरिकांना उत्सुकता लागली आहे.

हे वाचा >> विश्लेषण : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईसाठी किती फायदेशीर? काय आहेत वैशिष्ट्ये?

Leopard Safari at Sanjay Gandhi Park Announcement by Guardian Minister Ashish Shelar Mumbai news
संजय गांधी उद्यानात ‘बिबट्या सफारी’; पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Devendra Fadnavis assurance in investigation in Chandrapur district cooperative bank recruitment
चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरतीची चौकशी, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; पोतराजेंच्या उपोषणाची सांगता
gahunje stadium ind vs eng t 20 match
Ind vs Eng : कोल्डप्लेसाठी स्वतंत्र ट्रेन, पण पुणेकरांना साधी बसही मिळेना; भारत वि. इंग्लंड सामन्यासाठी पोहोचण्याचा मनस्ताप अटळ!
coastal road issue environmentalists oppose giving part of land close to sea to breach candy
कोस्टल रोड मार्गात नवा पेच; भराव भूमीचा भाग ब्रीच कँडीला देण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध
mmrda invited tenders for direct access route from Badlapur to Mumbai reducing congestion
बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई काही मिनिटात, एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या प्रकल्प आराखड्यासाठी निविदा मागवल्या
ie thinc
IE THINC: ‘तंत्रज्ञान सुलभ आणि परवडणारे झाले पाहिजे’
A youth died in a bus accident near Gorai Agar Mumbai news
गोराई आगारातील बसने तरुणाला चिरडले,भाडेतत्वावरील बस अपघातांच्या घटनांचे सत्र सुरुच

एमएमआरडीएकडून सात वर्षांपासून या पुलाचे काम सुरू होते. मुंबई पारबंदर प्रकल्प (MTHL) हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. या सेतू पुलाला तीन ठिकाणी इतर महामार्गांची जोड दिली आहे. एमएमआरडीएच्या त्रैमासिक प्रगती अहवालानुसार, २०२४ या वर्षात या मार्गावरून ३९,३०० हजार प्रवासी वाहने धावतील आणि २०३२ पर्यंत १.०३ लाख वाहनांची रहदारी वाढू शकते.

अटल सेतूवर बस सेवा सुरू करावी, असा विचार नवी मुंबई महानगरपालिकेकडून केला जात आहे. नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, पुलाची लांबी पाहता बस प्रवाशांसाठी त्याची उपयुक्तता तपासली जात आहे. पुलालगत बस थांबे नसल्यामुळेही बससेवेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

याचप्रकारे मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणाऱ्या बेस्टनेही पथकर भरण्याच्या कारणास्तव या पुलावरून बस सेवा सुरू करण्याच्या योजनेला अद्याप अंतिम रूप दिलेले नाही. हलक्या वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी २५० रुपये असा पथकर महाराष्ट्र सरकारने निश्चित केला आहे. एमएमआरडीएतर्फे जानेवारी ते मार्च २०२३ या पहिल्या त्रैमासिक प्रगती अहवालात बससाठी ५५० रुपये पथकर प्रस्तावित करण्यात आला आहे.

आणखी वाचा >> “२७ आयफेल टॉवर उभे राहतील, पृथ्वीला दोनदा प्रदक्षिणा…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितली अटल सेतूची वैशिष्ट्ये

दरम्यान, बेस्टच्या बसेस नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात सेवा देत असताना मुंबईच्या प्रवेशद्वारावर पथकर भरत आहेत. त्यामुळे रोखीची अडचण असून बेस्टला अटल सेतू मार्गावर पथकरात सूट हवी आहे. याबाबत त्यांना शासन निर्णयाची प्रतिक्षा आहे. बेस्टने मागच्या महिन्यात मुंबईतील प्रवेशद्वारावर पथकर भरण्यापोटी ८६ लाख रुपये खर्च केले आहेत, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने आपल्या बातमीत दिली.

Story img Loader