दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मोठे वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाबरोबर बोलणी सुरू आहेत. त्यामुळे किती दिवस राष्ट्रवादी आमच्याबरोबर राहील हे माहिती नाही, असे पृथ्वीराज चव्हाण कर्नाटकात प्रचारावेळी बोलताना म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“कर्नाटकात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने थोडा गैरसमज झाला आहे. अशी कोणतीही चर्चा कोणत्याही पक्षाबरोबर करण्याचा प्रश्नच नाही. कारण, निवडणुकीला एक वर्ष राहिले आहे. आम्ही निवडणुकीची तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व जण काम सुरू करतोय. त्यामुळे अशा प्रकाराची चर्चा करणे म्हणजे, राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी खडसावले आहे.

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना दिल्लीकरांनी का नाकारलं? ‘आप’वर मतदार असमाधानी का होते? सर्वेक्षणातून समोर आली कारणं
Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Delhi Election Result 2025
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर ‘आप’च्या नेत्यानेच केजरीवालांना दिला सल्ला; म्हणाले, “काँग्रेसबरोबर…”
US will take over Gaza Strip,
गाझा पट्टी ताब्यात घेऊ!ट्रम्प यांची धक्कादायक घोषणा; अमेरिकेच्या मित्रांकडूनही विरोध
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका

हेही वाचा : राहुल गांधी आणि एम.के स्टॅलिन यांचा सुप्रिया सुळेंना फोन, शरद पवारांच्या अध्यक्षपदावर झाली चर्चा; नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांचा भाजपाबरोबर जाण्यासाठी दबाव असल्याने शरद पवारांनी निवृत्ती घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबद्दल विचारल्यावर जयंत पाटलांनी म्हटले, “अशा चर्चा सुरू असतात. तेवढ्यासाठी शरद पवार एवढा मोठा निर्णय घेतील असे वाटत नाही. पण, अशा चर्चांबद्दल मला माहिती नाही.”

हेही वाचा : अजित पवार की सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? अनिल देशमुख स्पष्टच म्हणाले…

नेमके काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

“काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकात भाजपाला विजय मिळणार नाही, ही बाब निश्चित आहे. त्यामुळे जनता दलाला ( धर्मनिरपेक्षक ) रसद पुरवण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. त्यात राष्ट्रवादीनेही कर्नाटकात काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजून तरी आमच्याबरोबर आहे. ते किती दिवस आमच्याबरोबर राहतील ते माहीत नाही. कारण, भाजपाबरोबर त्यांची रोज बोलणी सुरू आहेत,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते.

Story img Loader