मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही अद्याप अजित पवारांसह त्यांच्या गटातील मंत्र्यांना खाते मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर ते आज (१२ जुलै) दिल्लीला गेले. हाच मुद्दा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत अजित पवारांना टोला लगावला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज छोट्या साम्राज्याचे राजे होते. दिल्लीत त्यांना ५ हजारांची मनसबदारी दिली, तेव्हा ते ती मनसबदारी लाथाडून महाराष्ट्रात परत निघून आले होते. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. हीच महाराष्ट्राची भूमिका आहे.”

Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Chhaava
जेव्हा विकी कौशलला पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पेहरावात पाहिलं तेव्हा…; अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला, “कोणी गोरागोमटा…”
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
Satguru Mata Sudiksha
मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख – माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज
Ajit Pawar avoided to sitting next to sharad pawar
Ajit Pawar : शरद पवारांच्या बाजूला बसणं का टाळलं? अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “माझा आवाज…”
Abhishek Bachchan
“आराध्याकडून कोणत्या अपेक्षा…”, अभिषेक बच्चन पालकत्वावर बोलताना म्हणाला, “फक्त आई-वडिलांनी…”
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”

“एक माणूस जो इथं राजा म्हणून राहत होता, तो दिल्लीला…”

“एक माणूस जो इथं राजा म्हणून राहत होता, तो दिल्लीला सुभेदार बनायला चालला आहे. मोठ्या राज्यात सुभेदार होण्यापेक्षा, लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं आहे,” असं म्हणत त्यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं.

“सोशल मीडियावर तरुणांना घाबरवलं जातंय”

सोशल मीडियावर लिहिणाऱ्या तरुणांवर होणाऱ्या कारवाईवर जितेंद्र आव्हाड “सोशल मीडियावर तरुणांना घाबरवलं जातंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांना उचलून नेलं जात आहे. हे तरुण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून व्यक्त होतात. ते कुणाला आई-बहिणीवरून शिव्या देत नाहीत.”

“सरकार हे जास्त दिवस असं करू शकणार नाही”

“आपले विचार स्वतंत्रपणे मांडणे हा या देशातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुलभूत अधिकारांमध्ये हा अधिकार दिला आहे. हा मुलभूत अधिकार हिरावून घेणे, त्यांचा आवाज दाबणे बरोबर नाही. सरकार हे जास्त दिवस असं करू शकणार नाही,” असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला.

हेही वाचा : “जितेंद्र आव्हाडांमुळे पक्षाचं नुकसान झालं”, अजित पवारांच्या आरोपाला शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “भाजपाबरोबर…”

“आमचे ४५ आमदार तर आमच्याकडेच आहेत”

“काँग्रेसचे आमदार जास्त आहेत हे कशावरून? आमचे ४५ आमदार तर आमच्याकडेच आहेत. आम्ही त्यांच्याकडे पत्र पाठवणार आहोत आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या पत्रावर सही करा अशी मागणी करणार आहोत,” असं सूचक वक्तव्यही जितेंद्र आव्हाडांनी केलं.

Story img Loader