राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर आता पक्षाचा अध्यक्ष कोण, पक्ष व पक्षचिन्ह कुणाचं यावरून वाद सुरू आहे. हा वाद थेट केंद्रीय निवडणूक आयोगासमोर गेला आहे. त्यावर आयोगाने सुनावणी सुरू केली आहे. याच सुनावणीतील एका प्रसंगावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड शनिवारी (७ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेतच भावूक झालेले पाहायला मिळाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला त्या वकिलाचं बोलणं ऐकून असं वाटलं की, आपण कशासाठी लढत आहोत. कुठली नीती, कुठली मुल्ये. हे घरात बसल्यानंतर शरद पवारांनी फोन करून सांगितलं की, तुम्हाला अमूक अमूक मंत्री केलं आहे, जा शपथविधी करा. याचं शरद पवारांना काय फळ मिळालं, तर ते हुकुमशाह आहेत.”

Sharad PAwar
“दिवट्या आमदार…”, पुण्यातील आमदारावर शरद पवारांची टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या नावाने…”
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
Skywalk for vitthal rukmini Darshan in Pandharpur Approval of the Summit Committee headed by the Chief Minister
पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शन रांगेसाठी ‘ स्कायवॉक ‘, १२९ कोटी खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता
Sharad Pawar Reaction on Akshay Shinde Death
Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
devendra fadnavis reaction on akshay shinde dea
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
guardian minster mps and mlas remain absence in marathwada liberation day event
मुक्तीसंग्राम कार्यक्रमाला लातूरमध्ये पालकमंत्र्यांपासून खासदार-आमदारांची दांडी
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा

“एवढंच होतं तर शरद पवारांना सोडून जाताना त्यांना…”

“शरद पवार हुकुमशाहासारखे वागतात आणि त्यांनी पक्षात लोकशाहीच जीवंत ठेवली नाही, हे वाक्य महाराष्ट्रातील एका माणसाला तरी पटतं का सांगावं. एवढंच होतं तर शरद पवारांना सोडून जाताना त्यांना सांगायचं होतं की, तुम्ही लोकशाहीवादी नाहीत. आम्हाला तुमच्या पक्षात राहायचं नाही. आम्ही स्वतंत्र पक्ष काढतो आणि स्वतंत्रपणे हा पक्ष चालवतो,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ पाहा :

“वकिलांमार्फत जे बोलण्यात आलं ते सहन न होणारं”

“शरद पवारांच्या हातातील पक्ष वाढला, मोठा झाला. आता हे तो पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तोपर्यंतही राजकारण म्हणून समजू शकतो. मात्र, काल निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाच्या वकिलांमार्फत जे बोलण्यात आलं ते सहन न होणारं होतं. ज्यांनी शरद पवारांकडून सगळं घेतलं त्यांना इतकं असंवेदनशील होणं शोभत नाही,” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.