मुंबई : मराठवाड्याच्या उत्तर भागापासून मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झाली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाटसदृश स्थिती राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्याच्या उत्तर भागापासून मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. परिणामी पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भात उष्णतेची लाट सदृश स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. रविवार आणि सोमवारी पूर्व विदर्भात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असून, हवामान विभागाने नारंगी इशारा दिला आहे.

कुठे कोणता इशारा?

शनिवार – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर. (पिवळा इशारा)

रविवार – कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, वाशिम, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा यवतमाळ (पिवळा इशारा). गडचिरोली, चंद्रूपर (नारंगी इशारा)

सोमवार – वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर गडचिरोली, चंद्रपूर (पिवळा इशारा), भंडारा, गोंदिया (नारंगी इशारा)