आमदार सत्यजीत तांबे यांनी गुरुवारी विधानपरिषदेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले की, राज्याचा उत्पादन शुल्क विभाग राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत सक्षम आहे. मात्र या विभागामध्ये काही त्रूटी असून त्या दूर करणे गरजेचे आहे. तांबे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क विभागातून ६० हजार कोटींचं उत्पन्न निघू शकतं. मात्र, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आणि चोरी थांबवावी लागेल.

सत्यजीत तांबे यांनी आपल्या भाषणामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, “उत्पादन शुल्क खात्याच्या माध्यमातून २०११-१२ या वर्षात ८ हजार ६०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्याचवेळी उत्तर प्रदेशला ८ हजार १३९ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. २०२३-२४ साली महाराष्ट्राला या खात्यातून २५ हजार २०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले तर उत्तर प्रदेशला याच खात्यातून मिळणारे उत्पन्न हे ५८ हजार कोटी रुपयांवर गेले आहे. महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क विभागातून ६० हजार कोटींचं उत्पन्न निघू शकतं. मात्र त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आणि चोरी थांबवावी लागेल.

Income Tax
Income Tax : “वर्षाला ६० लाख रुपयांपेक्षा कमी कमावणारे सर्व गरीब, कारण ७० टक्के पगार तर…” तंत्रज्ञाची पोस्ट व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
BMC budget 2025 news in marathi
पालिकेच्या अर्थसंकल्पाला मालमत्ता कराचा हात; १२५० कोटींनी उद्दिष्ट वाढले; ७५ टक्के मालमत्ता कर वसूल
new Income Tax Bill
सहा दशके जुना प्राप्तिकर कायदा बदलणार? नवीन विधेयकात काय आहे? सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?
Budget New Income Tax Act for tax reforms
कर सुधारणांसाठी नवीन प्राप्तिकर कायदा
A budget that makes you aware of your limitations
वित्त: मर्यादांची जाणीव करून देणारा अर्थसंकल्प
अर्थसंकल्पानंतर तुमचा इन्कम टॅक्स वाढला की कमी झाला? जाणून घ्या सोप्या भाषेत (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Income Tax Budget 2025 : १२.७५ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त, ४ ते ८ लाख रुपयांवर ५ टक्के प्राप्तीकर कसा?
Congress Statistical Analysis Department head Praveen Chakraborty allegations regarding voter turnout Mumbai news
मतदारवाढ अनाकलनीय; काँग्रेसच्या सांख्यिकी विश्लेषण विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांचा आरोप

हेही वाचा- बुरा ना मानो होली है! होळीच्या निमित्ताने सत्यजीत तांबेंचा राहुल गांधींना सल्ला, म्हणाले…

दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी आपल्या भाषणात राज्याचे सौर उर्जेसाठीचे धोरण नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय वीज खरेदी करारही झाले नसल्याचे ते म्हणाले. इतर राज्यांशी तुलना करून दाखवताना महाराष्ट्र राज्य हे सौर उर्जा प्रकल्पांमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत मागे असल्याचे सत्यजीत तांबे यांनी सदनात म्हटले. सौर उर्जेवरचा अवलंब वाढवल्यास राज्याला दीर्घकाळासाठी त्यातून उत्पन्नही मिळेल आणि राज्य पर्यावरणपूरक होण्यासाठीही एक पाऊल पुढे टाकेल, असंही ते यावेळी म्हणाले.

Story img Loader