मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. रोज म.रे.(मध्य रेल्वे) त्याला कोण रडे? अशी आता लोकलने ऑफिस गाठणाऱ्यांची अवस्था झाली आहे. मागच्या आठवड्यात मध्य रेल्वेने जंबो ब्लॉक घेतला होता. त्यानंतर मध्य रेल्वेची लोकलसेवा रुळावर यायला पुढचे दोन ते तीन दिवस गेले होते. अशात आज पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.

कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने

सिग्नल मिळत नसल्याने अनेक लोकल कल्याण स्थानकांतच उभ्या राहिल्या होत्या. सकाळी ६ वाजून १२ मिनिटांची लोकल ६.२८ पर्यंत स्थानकात उभी होती. या गोष्टीमुळे ऑफिस गाठणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईकरांच्या ऑफिसमधला लेट मार्क आज ठरला आहे असंच चित्र आहे.

Deonar Pada cemetery, Deonar Pada cemetery lights,
मुंबई : देवनार पाडा स्मशानभूमी अंधारात, विजेचे दिवे बंद असल्याने नागरीकांना मनस्ताप
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Shop fire Nashik, hospital safe Nashik, fire Nashik,
नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित
Mumbai, Worker died, Worker hit by car,
मुंबई : हिरे व्यापाऱ्याच्या गाडीच्या धडकेत कामगाराचा मृत्यू, सागरी किनारा रस्त्यावरील घटना
cyber crime
New Cyber Fraud: मोबाइलच्या किपॅडवर ‘शून्य’ दाबताच लाखोंचा गंडा; या सायबर स्कॅमपासून सावध व्हा
leopard got stuck in a cage set up by the forest department in Girda village Buldhana | गिरडा शिवारात पुन्हा 'ट्रॅप'!सहावा बिबट अडकला पिंजऱ्यात; 'ती' अडकली, 'तो' रेंगाळला... ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
गिरडा शिवारात पुन्हा ‘ट्रॅप’!सहावा बिबट अडकला पिंजऱ्यात; ‘ती’ अडकली, ‘तो’ रेंगाळला…
vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ
Ten accused who blocked vehicles on the highway and committed robberies arrested in Chhattisgarh
वर्धा: सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या टोळीस बेड्या

चाकरमान्यांचे आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही हाल

मुंबईत कामाच्या निमित्ताने जाणारे अनेक मध्यमवर्गीय, चाकरमानी हे बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, ठाणे अशा उपनगरांमधून मुंबई गाठत असतात. लोकल हे त्यांच्या प्रवासाचं प्रमुख माध्यम आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे सातत्याने रखडत असल्याचा फटका या सगळ्याच प्रवाशांना बसतो आहे. पाऊस पडल्यानंतर एक दिवसातच म्हणजेच सोमवारच्या दिवशीही मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. आता दुसऱ्या दिवशीही तशीच अवस्था पाहण्यास मिळते आहे.

ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

हवामान विभागाने, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांना आयएमडीने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय राज्यभरात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज कायम आहे. त्यामुळे पावसाचा परिणाम लोकल सेवेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.