देशाचा अर्थप्रपंच आणि जनसामान्यांचा संसार नेटका करू पाहणाऱ्या अर्थसंकल्पाला अभूतपूर्व करानो संकटातून सावरण्याचाही पैलू आहे. अर्थसंकल्पाच्या या ‘न भूतो, न भविष्यती’ वैशिष्टय़ाचे कंगोरे आपल्यापुढे नेमके कोणत्या अर्थाने येतील, ते उलगडून सांगण्याची परंपरा ‘लोकसत्ता’ पार पाडणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडतील आणि त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता आयोजित ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात, करोनाकालीन आर्थिक चणचणीच्या स्थितीत अर्थमंत्र्यांनी साधलेल्या कसरतींचा ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे वेध घेतील.

करोना संकटाने जनसामान्यांच्या जीवनात केलेली उलथापालथ आणि टाळेबंदी-निर्बंधांचे अर्थ जीवनावरील घाव ताजे असताना, यंदाचा अर्थसंकल्प या संबंधाने दिलासा देण्याचे काम करेल की, खिशाला कात्री लावणारा मध्यमवर्ग-पगारदारांवरील करांचा जाच वाढेल, हे अर्थमंत्र्यांच्या सोमवारच्या भाषणातूनच स्पष्ट होईल. घोषणांचे माप नेमके कसे पडते, त्याचे महत्त्व आणि अर्थ समजून घेण्यासाठी अर्थसंकल्पानंतरचे विश्लेषण निश्चितच उद्बोधक ठरेल.

अर्थसंकल्पानंतरचे विश्लेषण

सोमवार, १ फेब्रुवारी, सायं.६वा.

वक्ते : गिरीश कुबेर

संपादक-लोकसत्ता

सहप्रायोजक :

* पुनित बालन ग्रुप,

* लोकमान्य मल्टिपर्पज

को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

पॉवर्ड बाय :

* स्टोरीटेल अ‍ॅप

दूरचित्रसंवाद माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात, वाचकांनाही आपल्या शंका व प्रश्न मांडण्याची संधी मिळेल. सहभागासाठी

https://tiny.cc/Ls_BudgetVishleshan_2021

येथे नोंदणी आवश्यक.

Story img Loader