सिद्धेश्वर डुकरे

मुंबई : शेतकऱ्यांमधील शेतजमिनीसंबंधी वाद टाळण्यासाठी आणि त्यांच्यात सलोखा निर्माण होण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘सलोखा योजने’ला शेतकऱ्यांनी कमी प्रतिसाद दिला आहे.

Bachchu Kadu demands an inquiry of Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana from Election Commission
‘लाडक्या बहिणी’च्या अडचणी वाढणार, बच्चू कडूंची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
26 highly dangerous buildings in Thane are occupied by residents municipality issued notices four months in advance
ठाण्यात २६ अतिधोकादायक इमारती रहिवास व्याप्त, चार महिने आधीच खबरदारी घेत पालिकेने बजावल्या नोटीसा
Environmental clearance from the state itself revised notification issued by the central government Mumbai news
राज्यातूनच पर्यावरणविषयक परवानगी, केंद्र सरकारकडून सुधारित अधिसूचना जारी; गृहप्रकल्पांना दिलासा
Deonar waste land for Dharavi project Revenue Department requests Municipal Commissioner to provide land
देवनार कचराभूमीची जमीन धारावी प्रकल्पाला; जमीन देण्याची महसूल विभागाची पालिका आयुक्तांना विनंती
When will the dust settle on the Shivaji Park grounds
शिवाजी पार्क मैदानातील मातीचा धुरळा कधी खाली बसणार?
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!
Arbitrator hearing on objections of 1062 farmers in Naina area
नैना क्षेत्रातील १०६२ शेतकऱ्यांच्या हरकतींवर लवादाकडून सुनावणी

शेतजमीन हा प्रत्येकाचा जिव्हाळय़ाचा व संवेदनशील विषय आहे. जमिनीच्या वादामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये एकमेकांबद्दल असंतोषाची भावना व दुरावा निर्माण होत असतो. यामुळे अनेक पिढय़ांचे नुकसान झाले आहे. हे टाळून सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना राज्य शासनाच्या महसूल विभागाने राबवली आह़े या योजनेनुसार एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल़ अशा शेतजमीन धारकांचे दस्तांच्या अदलाबदलीसाठी नोंदणी शूल्क व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आह़े मात्र ही योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत २२० दस्तांची मुद्रांक विभागाकडे नोंदणी झाली आहे, तर बाधित शेतकऱ्यांच्या प्रकरणांची संख्या १ लाख ३२ हजार ८३४ आहे. या योजनेला राज्यातील बाधित शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिला आहे.

राज्य शासनाने अधिसूचना काढून ३ जानेवारी २०२३ मध्ये ही योजना लागू केली. यामध्ये बाधित शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली असून नाममात्र १००० रुपये शुल्क तर नोंदणी शुल्क देखील १००० रुपये असे दोन हजार रुपये आकारले जातात. या योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र शेतकरी कमीत कमी १२ वर्षांपासून बाधित असला पाहिजे अशी अट आहे. तसेच दस्तामध्ये अधिकारा अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र, भोगवटादार वर्ग, सत्ताप्रकार, पुनर्वसन, आदिवासी, कूळ आदी बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवीत आहे, अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. गावपातळीवरील तंटामुक्त समिती, तलाठी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी हे शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.

महसूल विभागाची आकडेवारी काय सांगते?

या योजनेत राज्यातील सर्व मुद्रांक विभागातून २२० दस्तांची नोंद झाली आहे. यात अमरावती (९२), लातूर(२३), मुंबई (०), नाशिक (३०), ठाणे (१८), पुणे (२६), औरंगाबाद (१३), नागपूर (१८) असा समावेश आहे. ही दस्तांची नोंदणी करताना शासनाने १ कोटी ८३ लाख ८३ हजार २९५ रुपये इतकी सूट बाधित शेतकऱ्यांना दिली आहे. प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांच्या तुलनेत ही संख्या फार कमी आहे. राज्यात गाव नमुना सातबारा असलेल्या गावांची एकूण संख्या ४४ हजार २७८ आहे. अशाप्रकारे बाधित प्रकरणांची संख्या १ लाख ३२ हजार ८३४ आहे. जमिनीच्या वादात बाधित असलेल्या व्यक्ती, आप्तेष्ट, नातेवाईक यांची संख्या २६ लाख ५६ हजार ६८० इतकी असल्याची महसूल विभागाची आकडेवारी सांगते.

Story img Loader