मुंबई : मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी तसेच मधमाशा पालनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी देशात प्रथमच मध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १८ व १९ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार असून महोत्सवाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

देशातील पहिले मध संचालनालय १९४६ साली महाबळेश्वर येथे स्थापन करण्यात आले. त्यानंतर केंद्र शासनानेही मध संचालनालय सुरु केले. महाराष्ट्रात मधाचा सर्वाधिक, पाचशे रुपये हमीभाव दिला जातो. आजमितीला राज्यात १०७९ गावांमध्ये ४ हजार ५३९ शेतकरी मध उत्पादन करत आहेत.

Preloved Eco Haat, used products, clothes,
वस्तूंच्या पुनर्वापरासाठी…
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
CCTV cameras Thane to Badlapur, CCTV cameras Thane,
ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरांमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे
meeting at Provincial Office Pandharpur discussed administrative plans for Kartiki Yatra devotees
कार्तिक यात्रा कालावधीत गर्दी व्यवस्थापन, स्वच्छतेला प्राधान्य, कार्तिकी नियोजनासाठी प्रशासनाची बैठक
ATM-Coverage-Lead-Image
Adventure Tourism Meet (ATM) 2024: भारतात साहसी पर्यटनाला प्रोत्साहन आणि संधी!
Aranyaka Kendra of Forest Department is waiting for customers
वन विभागाचे अरण्यक केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत
A garba event in Indore has been cancelled in Indore
Garba Cancelled : “हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुषांमधील संबंध वाढवण्यासाठी गरब्याचं आयोजन”, बजरंग दलाचा आरोप; ३५ वर्षांची परंपरा खंडित!
Mahayuti Social Outreach through various programs in Nashik print politics news
नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण

हेही वाचा >>>नायरपाठोपाठ शीव व कूपरमध्येही विशेष मुलांसाठी पुनर्वसन केंद्र?

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना राबवित असते. त्यात प्रामुख्याने ‘मध केंद्र योजना’ व ‘मधाचे गाव’ या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मध महोत्सवात मध, मेण यांपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांची विक्री करणारे कक्ष असतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.