मुंबई : मुंबईतील आठ रेल्वेस्थानकांचे नामांतर करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव विधानसभेत मंगळवारी एकमताने मंजूर करण्यात आला. रेल्वेस्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलून स्थानिक मराठी नावे देण्याची मागणी बरीच वर्षे करण्यात येत होती. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने आता विधिमंडळात ठराव मंजूर करून केंद्र सरकारला शिफारस करण्याची भूमिका घेतली आहे.

मध्य रेल्वेच्या करीरोड रेल्वेस्थानकाचे लालबाग, तर सँडहर्स्ट रेल्वेस्थानकाचे डोंगरी, पश्चिम रेल्वेवरील मरीनलाईन्स स्थानकाचे मुंबादेवी व चर्नीरोडचे गिरगाव आणि हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीनचे काळाचौकी, सँडहर्स्ट रोडचे डोंगरी, डॉकयार्ड रोडचे माझगाव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचे तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक असे नामांतर करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत मांडला.

Jammu and Kashmir assembly elections
नंदनवनातील निवडणूक: जम्मू-काश्मीरमध्ये उद्या मतदान, १० वर्षांनंतर विधानसभेसाठी निवडणूक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
One Nation One Election
मोदी सरकार ‘एक देश एक निवडणूक’ लागू करण्याची शक्यता; अल्पमतात असलेल्या भाजपाला एनडीएतील घटकपक्षांचा पाठिंबा मिळणार?
Nar Paar Girna river linking project approved in state cabinet meeting
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प मान्यतेतून मतांसाठी सिंचन
Central Govt Big decision of Ladakh New Districts
Ladakh New Districts : लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ऐन निवडणुकांच्या तोंडावर पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा!
revised pension to maharashtra government employees proposal in state cabinet meeting today
कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज प्रस्ताव
Nagpur st employees marathi news
एसटी कामगार पुन्हा रस्त्यावर… कृती समिती काय म्हणते…
National Organization Secretary notice to BJP leaders regarding Assembly elections 2024 nagpur
“विधानसभा निवडणूक गांभीर्याने घ्या,” राष्ट्रीय संघटन सचिवांची भाजप नेत्यांना तंबी

हेही वाचा >>> बोगस पॅथोलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कठोर कायदा – सामंत

यावेळी दादर स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी रेल्वेस्थानक करण्याची मागणी काँग्रेसचे नितीन राऊत यांनी केली. तर छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला २०२१ मध्ये पाठविण्यात आला होता. त्याची सद्यास्थिती काय आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. महायुती सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा ठराव केला होता. त्यानुसार केंद्र सरकारने मान्यता दिल्यापासून या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. पुढील प्रक्रिया काय असेल ? विधिमंडळाच्या उभय सभागृहाने आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा केलेला ठराव केंद्र सरकारच्या गृह विभागाकडे सादर केला जाईल. गृह विभागाकडून विविध खात्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाते. रेल्वे स्थानकांची नावे बदलायची असल्याने रेल्वे खात्याची मंजूरी आवश्यक असेल. यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात एलफिस्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी स्थानक असे नामकरण करण्यात आले होते.