मुंबई : आधुनिक तंत्रज्ञान तसेच मराठीतील सर्व बोली भाषांचे जतन व संवर्धनाचा समावेश असलेल्या अद्ययावत मराठी भाषा धोरणाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर, संभाषण आणि दर्शनी भागात मराठी भाषेत फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मराठीत संभाषण न करणारे अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, बँकामध्ये सूचनाफलक , अर्ज नमुने मराठीत ठेवणे या आस्थापनांवर बंधनकारक असेल. म्हाडा, सिडको, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज कंपन्या यांना सर्व व्यवहार मराठीतूनच करावे लागतील.

हेही वाचा >>> मुंबईत भाजपचे धक्कातंत्र; पूनम महाजन यांचे भवितव्य अधांतरी

congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
uday samant reaction marathi and non Marathi dispute over satyanarayan puja
मराठी भाषेबाबत जर कोणी अटकाव करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे : उदय सामंत
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
pil filed in High Court demanding ED inquiry into Valmik Karad accused in Santosh Deshmukhs murder
वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांच्या ईडी चौकशीचे आदेश द्या, जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी
Dont just see illegal banner display also report it Ambernath Municipality appeals to citizens
बेकायदा बॅनरबाजी फक्त बघू नका, तक्रारही करा; अंबरनाथ नगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
Manisha Achadaye issued notice to contractor over stalled sports complex work in VTC ground
महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती क्रीडा संकुलाच्या कंत्राटदाराला नोटीस, बदल्यांच्या निर्णयालाही स्थगिती

शासकीय कार्यालयांमध्ये परदेशी नागरिक किंवा बाहेरच्या राज्यातील नागरिक वगळता अन्य नागरिकांना तसेच सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मराठीतूनच संभाषण करणे अनिवार्य असेल. मराठी भाषेतून संभाषण न करणाऱ्या अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या विरोधात कार्यालया प्रमुखांकडे तक्रार करता येईल. झालेली कारवाई समाधानकारक न वाटल्यास तक्रारदाराला विधिमंडळाच्या भाषा समितीकडे दाद मागता येईल. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार मराठीतून करणे बंधनकारक असेल. मराठी ही रोजगाराची भाषा म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. खासगी कारखान्यांमध्ये भरतीच्या वेळी इंग्रजीबरोबरच मराठीतूनही मुलाखत घेतली जावी, अशी शिफारस तज्ज्ञ समितीने केली आहे.

Story img Loader