मुंबई :  महायुती सरकारचा घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद वाचविण्यासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहकार कायद्यातील सुधारणेचे विधेयक संमत करून घेण्यात अपयश आले. आता सरकारने अध्यादेश काढून कडू यांच्याविरोधात दोन वर्षे अविश्वास ठराव आणता येणार नाही अशी तरतूद केली आहे.

हेही वाचा >>> सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर

Sachin Vaze, Sachin Vaze news, Anil Deshmukh,
देशमुखांवरील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : वाझे यांना माफीचा साक्षीदार होऊ देण्यास विशेष न्यायालयाचा नकार
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Challenges before President PT Usha in the Indian Olympic Association struggle sport news
वार्षिक सभेत उषा यांच्या विरोधात अविश्वास ठराव; भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षांसमोरील आव्हाने अधिक कठीण
avinash jadhav bjp
टोलमुक्तीनंतर श्रेय मिळविण्यासाठी चढाओढ
shinde shiv sena set up entire system required for modi rally in thane
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची छाप
Bhoomipujan municipal development works Mumbai,
मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका
big decision of Modi government, agriculture sector,
कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय जाणून घ्या, तिन्ही योजनांची सविस्तर माहिती
Abdul sattar
Video: आर्थिक व्यवहाराच्या आरोपाने मंत्री अब्दुल सत्तार संतापले; बाजार समित्यांच्या परिषदेतून काढता पाय

जिल्हा बँकेच्या अध्यक्षांविरोधात दोन वर्षांच्या आता अविश्वास प्रस्ताव दाखल करता येणार नाही अशा सुधारणा प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सहकार कायद्यातील सध्याच्या तरतुदींनुसार सहकारी संस्थामधील एखादा अध्यक्ष-उपाध्यक्षाने संस्थेत भ्रष्टाचार वा मनमानी कारभार केला त्याच्यावर सहा महिन्यानंतर अविश्वास प्रस्ताव आणण्याची तरतूद आहे. मात्र बच्चू कडू यांचे अध्यक्षपद वाचविण्यासाठी हा कालावधी सहा महिन्यांवरून दोन वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार त्याबाबतचे विधेयक विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आले होते.

* केवळ जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांना सूट

* सहकारी संस्थांच्या पधाधिकाऱ्यांवर सहा महिन्यानंतर अविश्वास ठराव आणण्याच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्यात आली.

* केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षांवर  पद धारण केल्यापासून दोन वर्षांच्या आत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही. * अन्य संस्थांच्या बाबतील सहा महिन्यांची तरतूद कायम ठेवण्याबाबत सहकार विभागाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.