मुंबई : शासकीय सेवा व अन्य स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून अशी कृत्ये करणाऱ्यांना तीन ते पाच वर्षे तुरुंगवास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे विधेयक विधानसभेत शुक्रवारी सादर केले.

हेही वाचा >>> शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कायमचीच; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

The fake SBI branch was opened in Chhattisgarh's Sakti district
SBI Fake Branch : चित्रपटाला शोभेल अशी कथा! चक्क SBI ची बनावट शाखा सुरू केली, खोट्या नियुक्त्या अन् बरंच काही; कुठे घडला हा भयंकर प्रकार?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Action against cyber thieves by Central Crime Investigation Department Pune print news
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सायबर चोरट्यांविरुद्ध कारवाई; पुण्यासह देशभरात ३२ ठिकाणी छापे, २६ जणांना अटक
Fraud of crores by pretending to get good returns by trading in stock market
धक्कादायक! सायबर चोरट्यांनी केली एवढ्या कोटींची फसवणूक, कुठे घडला प्रकार?
Loksatta sarva karyeshu sarvada Review of 11 organizations working for society
सर्वकार्येषु सर्वदा : भटक्या जमातींना रस्ता शोधून देण्यासाठी धडपड
Action taken against by municipal corporation panel makers instead of ganesh mandal
गणेश मंडळांना अभय; फलक तयार करणाऱ्यांवर कारवाई
pune police ganeshotsav marathi news
गणेशोत्सवात गैरप्रकार करणाऱ्यांना स्थानबद्ध करून ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष केंद्र; प्रथमच अशी व्यवस्था
amitesh kumar pune crimes marathi news
“ईट का जबाब पत्थर से..”, आंदेकर खून प्रकरणानंतर पोलीस आयुक्तांकडून गुंडांना इशारा

पैसे घेऊन प्रश्नपत्रिकेविषयी कोणतीही माहिती उघड करणे, त्याविषयीची माहिती इतरांना देणे, अनधिकृतपणे परीक्षा केंद्रात प्रवेश करणे, आदी कोणत्याही प्रकारे पेपरफुटी किंवा अन्य गैरप्रकार करणाऱ्यांवर या विधेयकातील तरतुदींनुसार कारवाई होऊ शकणार आहे. परीक्षा घेणाऱ्या किंवा प्रक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्ती, संस्था किंवा कंपन्या यातील कर्मचारी किंवा कोणीही अशा गैरप्रकारांमध्ये सहभागी असतील, त्यांच्यावरही कठोर कारवाईची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. गेल्या काही काळात पेपरफुटी, सामूहिक कॉपी व अन्य अनेक गैरप्रकार उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर उपाययोजना करण्यासाठी हे विधेयक सादर केले आहे.