मुंबई : महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील  प्रभागांची रचना, त्यांची हद्द निश्चित करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे देणाऱ्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी मोहोर उमटवली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा मार्ग मोकळा झाला. 

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, ही राज्य मंत्रिमंडळाची तसेच विधिमंडळाची शिफारस मान्य करण्यास राज्य निवडणूक आयोगाने ठाम नकार दिला होता. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना सर्वोच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद या महानगरपालिका, २०० नगरपालिका आणि ८०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना घेण्याचा आदेशही दिला होता. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरू केली होती. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या राज्य सरकारने या निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या उद्देशाने प्रभाग रचनेचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रभाग रचनेचे अधिकार स्वत:कडे घेणारे आणि आयोगाने केलेली प्रभागरचना रद्द करणारे विधेयक सोमवारी विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये एकमताने मंजूर झाले होते. त्यानंतर हे विधेयक अंतिम मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आले होते. त्याला राज्यपालांनी संमती दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे आता केवळ निवडणुका घेण्याचे अधिकार उरले आहेत. निवडणूक प्रक्रियेचे अधिकार स्वत:कडे घेण्याचे कायद्यात रुपांतर झाल्याने आता न्यायालयीन कसोटीवर हा कायदा टिकण्याचे आव्हान सरकारसमोर असेल. 

bjp face tough battle in haryana jharkhand assembly election opposite in confidence after lok sabha election results
विश्लेषण : हरियाणा, झारखंडमध्ये विधानसभेला भाजपची कसोटी; लोकसभा निकालाने विरोधकांना आत्मविश्वास?
Ganesh Naik challenged the Chief Minister through CIDCO and Urban Development Department
अस्वस्थ गणेश नाईक यांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
Ganesh Naik, eknath shinde,
अस्वस्थ गणेश नाईकांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान
India boycott of PM speech Modi Dhankhad criticize opponents
सभात्यागामुळे सत्ताधाऱ्यांना बळ; पंतप्रधानांच्या भाषणावर ‘इंडिया’चा बहिष्कार; मोदी, धनखड यांची विरोधकांवर टीका
mamta banerjee on tista river water
भारत-बांगलादेशच्या पाणीवाटप चर्चेवरून भडकलेल्या ममतादीदींचे पंतप्रधानांना पत्र; नेमके प्रकरण काय?
eknath shinde devendra fadnvis
काही संस्थांमध्ये ‘शहरी नक्षलवादी’! मुख्यमंत्र्यांचा दावा, मविआने खोटे कथानक पसरविल्याचा आरोप
MLA, Mahayuti,
नाराज मराठा समाजाला आपलेसे करण्यासाठी महायुतीच्या आमदारांचा खटाटोप
congress demand president rule,
“शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी!

राज्यपालांनी या विधेयकास मान्यता दिल्याने कायद्याचा मार्ग मोकळा झाल्याचे इतर मागासवर्ग विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांचे आभार मानले.

ओबीसींना तूर्त दिलासा : निवडणूक प्रक्रियेचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा कायदा मंजूर झाल्याने कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद या पाच महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत़  यादरम्यान ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जातील़  त्यानंतर दिवाळीच्या आसपास निवडणुका होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आह़े  या कायद्यामुळे ओबीसींना तूर्त दिलासा मिळाला आह़े