मुंबई : ‘‘कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून निवडून दिलेल्या काही जणांनी राज्यात मंत्रिपदाची शपथ घेतली. आता ते पक्ष आणि चिन्हावर दावा करीत आहेत. मात्र, भाजपबरोबर गेलेले सत्तेतूनही जातात. जो भाजपबरोबर गेला तो संपला’’, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी बंडखोरांना दिला.

अजित पवार यांच्या बंडाला प्रत्युत्तर देण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण केंद्रात खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी यशवंतराव चव्हाण केंद्र खच्चून भरले होते. या वेळी शरद पवार यांनी बंडखोर नेत्यांबरोबरच मोदी सरकावर जोरदार टीकास्त्र सोडले.

Naigaon police, Naigaon police saved women,
वसई : नायगाव पोलिसांचे १५ दिवसातील कौतुकास्पद कार्य, आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तीन महिलांचे वाचवले प्राण
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!
bangladesh seeks extradition of ex pm sheikh hasina
शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप
NRC application for adhar card
आसाममध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी नवा नियम; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…
women raped in indore
Raped In Indore: महिलेला विवस्त्र करत मारहाण आणि बलात्कार, नृत्य करण्यास भाग पाडले; आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची काँग्रेसची टीका
ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

‘‘पक्ष किंवा चिन्ह हातातून जाऊ देणार नाही. त्यामुळे जे गेले, त्यांची चिंता करू नका. मी पुन्हा जनतेमध्ये जाऊन नवे नेतृत्व निर्माण करेन’’, अशा शब्दांत पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

पुलोद’चा प्रयोग आणि नागालॅन्डमध्ये भाजपशी केलेल्या हातमिळवणीबद्दल अजित पवार यांनी टीका केली होती. त्यासही पवार यांनी प्रत्युत्तर दिले. ‘‘मी १९७८ मध्ये ‘पुलोद’चा प्रयोग केला. त्यामध्ये जनता पक्ष होता, भाजप नव्हे. तसेच नागालँड हे ईशान्येकडील सीमेवरील

राज्य असून, तिथे स्थिर, खंबीर सरकार असावे, या हेतूने सरकारला पाठिंबा दिला’’, असे पवार म्हणाले.

‘पांडुरंग म्हणायचे, गुरु म्हणायचे आणि आरोप करायचे असे प्रकार सुरू आहेत, असे सांगताना पवार यांनी बंडखोरांना पक्षाने खूप काही दिले, याकडे लक्ष वेधले. ‘‘एकाला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर निवडणुकीचे तिकीट दिले. महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्री केले. मी यांना काय कमी दिले?’’, असा सवाल पवार यांनी केला.

‘‘तुम्ही शिवसेनेबरोबर गेला, मग आम्ही भाजपबरोबर गेलो तर त्यात चूक काय, असे काही जण म्हणतात. पण, यात फरक आहे. शिवसेनेचे हिंदूत्व अठरापगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे आहे, तर भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे’’ असे नमूद करत पवार यांनी शिवसेनेबरोबरील आघाडीचे समर्थन करताना बंडखोरांना फटकारले.

हे आमदार उपस्थित

विधानसभेचे किरण लहामाटे, अशोक पवार, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्राजक्त तनपूरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रोहित पवार, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, चेतन तुपे, सुमन पाटील, मानसिंग नाईक, आशुतोष काळे, देवेंद्र भुयार (अपक्ष) आदी आमदार पवार यांच्या बैठकीला उपस्थित होते. श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे, फौजिया खान, वंदना चव्हाण हे खासदार तसेच विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, बाबाजानी दुर्रानी आदी उपस्थित होते.

‘भुजबळ पाहून येतो म्हणाले अन् तिकडे सामील झाले’

छगन भुजबळांनी तिकडे काय सुरू आहे, ते पाहून येतो म्हणून फोन केला आणि मंत्रीपदाची शपथ घेऊन तिकडे सामील झाले. त्यामुळे यापुढे कोणी ‘तिकडे काय चालले आहे हे पाहून येतो’ असे बोलले तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका, असा टोलाही पवार यांनी भुजबळांना लगावला.

 पवार म्हणाले..

’‘पांडुरंग म्हणायचे, गुरू म्हणायचे आणि आरोप करायचे, असे सध्या चालले आहे.

’त्यांचे नाणे चालणार नाही, म्हणून ते माझे छायाचित्र वापरत आहेत.

’शिवसेनेचे हिंदूत्व अठरापगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे, तर भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, मनुवादी आहे.

आमच्यावर जी टीका करायची असेल ती करा, पण आमच्या आई-वडिलांबद्दल बोलू नका. उद्योगपती रतन टाटा या वयातही काम करतात. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे वयाच्या ८० व्या वर्षी जाहिरातीत आणि मोठय़ा पडद्यावर दिसतात. वडीलधाऱ्यांना थांबायला सांगणाऱ्या मुलांपेक्षा आम्ही मुली बऱ्या.

– सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस