मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील आठ शेतकरी आंदोलकांना त्यांच्या गावात प्रवेश करण्यास आणि प्रस्तावित बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात समाजमाध्यावर कोणतीही टिप्पणी करण्यास मज्जाव करणारे दोन आदेश त्वरित मागे घेण्यात येतील, अशी हमी राज्य सरकारने गरुवारी उच्च न्यायालयात दिली.

जमावबंदीचा आदेश समर्थनीय नाही. तो लागू केल्याने लोक महिन्याभराने उपजीविकेचे साधन गमावतील. त्यामुळे लोकांना बंदी घातली जाऊ शकत नाही, असे तोंडी निरीक्षण न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने नोंदवले. त्यानंतर याचिकाकर्त्यांविरोधात काढलेले दोन्ही आदेश तातडीने मागे घेण्यात येतील, असे सरकारच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.

Refund if higher salary demand guarantee from ST employees
मुंबई : जास्त वेतन आल्यास परत द्या, एसटी कर्मचाऱ्यांकडून हमीची मागणी
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Goshalas, Maharashtra, Goshalas subsidy,
राज्यातील १३५ गोशाळांना झाली मोठी मदत; जाणून घ्या, राज्य सरकारने किती गोशाळांना दिले अनुदान
high court
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, न्यायिक अधिकाऱ्यांच्या नावेही पैशांची मागणी; उच्च न्यायालय प्रशासनाकडून प्रकाराची गंभीर दखल
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
massive protest in kolkata demanding resignation of cm mamata banerjee
पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाने तणाव; डॉक्टर प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; पोलिसासह आंदोलक जखमी
supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत
ministers given permission till august 30 for transfers within department ahead of poll
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांना ‘मोकळे रान’; बदल्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुभा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

न्यायालयाने सरकारच्या या वक्तव्याची नोंद घेऊन न्यायालयाने याचिका निकाली काढली.

राज्य सरकारने २२ एप्रिल आणि २५ एप्रिल रोजीच्या दोन आदेशांमध्ये २१ मेपर्यंत याचिकाकर्त्यांना त्यांच्या गावात प्रवेश करण्यास मनाई केली होती. तसेच समाजमाध्यमावरून प्रकल्पाबाबत गोंधळांची किंवा कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करणारी कोणतीही टिप्पणी, माहिती प्रसारित करण्यासही मज्जाव केला होता. या आदेशाविरोधात राजापूर तालुक्यातील विविध गावांतील आठ याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याचिका काय ?

अमोल बोले यांच्यासह आठ आंदोलकांनी याचिका केली होती. त्यानुसार, प्रस्तावित प्रकल्पात राजापूर तालुक्यातील काशिंगेवाडी, सागवे, विल्ये, दत्तवाडी, पालेकरवाडी, कात्रादेवी, कारीवणे, चौके, नाणार, उपळे, पडवे, साखर, तरळ आणि गोठीवरे ही गावे समाविष्ट आहेत, असे ५ जुलै २०१७ रोजीच्या पत्रानुसार त्यांना कळवण्यात आले. जानेवारी २०२२ मध्ये, राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून बारसू-सोलगाव-देवाचे गोठणे-शिवणे खुर्द-धोपेश्वर म्हणजेच बारसू सोलगाव पंचक्रोशी या नवीन प्रकल्पाच्या जागेचा प्रस्ताव दिला होता. या पत्रामुळे प्रकल्पाला विरोध सुरू झाला. प्रस्तावित प्रकल्पामुळे पूर्वजांकडून मिळालेल्या शेतीवर दीर्घकालीन परिणाम होऊन त्यांचे उपजीविकेचे साधन त्यांच्यापासून हिरावले जाईल, असे याचिकेत म्हटले होते.