मुंबई : ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिणेकडील भागात बाष्पयुक्त वारे आल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना पावसासाठी पिवळा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांत मेधगर्जना, विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

maharashtra recorded 33 to 35 degrees celsius maximumtemperature
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा; जाणून घ्या, कमाल तापमान का वाढले
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
weather department predicts rising temperatures in Mumbai with increased afternoon heat expected
मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!
Huge displeasure among passengers over ST fare hike Mumbai news
एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी

हेही वाचा : महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंक टॉयलेट, हिरकणी कक्ष, अतिरिक्त शौचायलांची सुविधा

‘फेंगल’ने थंडी घालवली

बंगालच्या उपसागरात तयार झालेले आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. चक्रीवादळाने अरबी समुद्रात प्रवेश केल्यानंतरही त्याची तीव्रता वाढलेली नाही. त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्रावर त्याचा विशेष परिणाम जाणवला नाही. पण, राज्याच्या बहुतांश भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे राज्यातील थंडी फेंगल चक्रीवादळाने घालवली आहे. पुढील आठवडाभर राज्यभरात थंडीत फारशी वाढ होणार नाही. कमाल – किमान तापमान स्थिर राहील, असा अंदाज हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी वर्तविला केला आहे.

हेही वाचा : बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण: लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या महत्त्वाच्या गुंडाचा सहभागाचा संशय

द्राक्ष बागायतदार धास्तावला

सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठे आहे. या जिल्ह्यांतील बहुतांश द्राक्षबागा आता फुलोऱ्यात आहेत. फुलोऱ्यात असताना पाऊस झाल्यास फळकुज होते, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून द्राक्ष बागांचे आतोनात नुकसान होते. त्यामुळे ढगाळ हवामान आणि पावसाच्या शक्यतेमुळे द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे. पण, हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्यास रब्बी हंगामात लागवड झालेल्या पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

Story img Loader