मुंबई : मध्य आशियातून हिमालयात येत असलेल्या पश्चिमी विक्षोपामुळे (थंड वाऱ्यामुळे) उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात वेगाने घट झाली आहे. गुरुवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये राज्यात सर्वात कमी १३.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही किमान तापमानात घट झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयात पश्चिम विक्षोप म्हणजे थंड हवेचे झोत सक्रिय झाले आहेत. त्यामुळे हिमालयाच्या काही भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे उत्तर भारतात दाट धुके पडल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे थेट उत्तर महाराष्ट्रात येत असल्यामुळे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात वेगाने घट झाली आहे. नाशिकमध्ये १३.२, नगरमध्ये १४.७, मालेगावात १५.७ आणि जळगावत १५.० अंश सेल्सिअस किमान तापमान होते.

Patients of cold cough fever in every house of Nagpur
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!

हेही वाचा : मराठी मनोरंजनसृष्टीसह कला क्षेत्रावर आश्वासनांचा पाऊस, नवीन चित्रनगरी, अनुदान वाढीसह सुसज्ज सोयी-सुविधांचे जाहीरनाम्यात आश्वासन

मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये १५.६, विदर्भातील नागपूरमध्ये १५.०, यवतमाळमध्ये १५.५, गडचिरोलीमध्ये १५.४, आणि भंडाऱ्यात १५.१ अंश सेल्सिअस तापमान होते. मध्य महाराष्ट्रात पुण्यात १५.२, साताऱ्यात १७.० अंश सेल्सिअस. किनारपट्टीवर आलिबागमध्ये १८.७, सांताक्रुजमध्ये १९.० आणि कुलाब्यात २४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा : आजपासून कारखान्यांची धुराडी पेटणार, जाणून घ्या साखर आयुक्तालयाचा निर्णय

दरम्यान, पुढील दोन दिवस दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान निर्माण होऊन किमान तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा पारा कमी होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Story img Loader