मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड मनोरी येथील रस्त्यांकडे मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून या रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड झाले आहे. या रस्त्यावर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बसगाड्या रुतून बसण्याच्या घटना गेल्या आठवड्यात दोनदा घडल्यामुळे बससेवा देणाऱ्या कंपनीने मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे मुंबई महानगरपालिकेची तक्रार केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबई महानगरपालिकेची अक्षरशः लाज गेली आहे.

मालाड येथील मनोरी हे मुंबई शहरापासून जवळच पण तरीही सोयी सुविधांपासून लांब राहिलेले बेट आहे. या बेटावर उत्तनपर्यंतच्या भागात सेवा देण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेची आहे. मात्र मनोरीत गेल्या अनेक वर्षांपासून सोयीसुविधा पोहोचलेल्याच नाहीत. या ठिकाणी असलेल्या रस्त्यांचीही दूरवस्था झाली आहे. महापालिकेने या ठिकाणी रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचे काम हाती घेतलेले असले तरी पावसाळ्यात अर्धवट काम करून थांबवण्यात आले आहे. पण त्यामुळे येथील नागरिकांना आणि वाहनचालकांना त्रास सोसावा लागतो आहे. रस्त्याच्या एका बाजूचे काम झाले आहे आणि अर्धा रस्ता मातीचा व चिखलाचा असल्यामुळे वाहनचालकांना अंदाज येत नाही. तसेच पर्जन्यजलवाहिन्यांचेही काम केलेले नसल्यामुळे अर्ध्या रस्त्यावर गुडघाभर पाणी असते. या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही.

Keshavnagar school, Nagpur,
नागपूर: रस्त्यालगतच्या केशवनगर शाळेची ‘ही’ समस्या कधी दूर होणार?
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
Advertising billboards, Western Expressway,
मुंबई : जाहिरात धोरणाचा पालिकेच्या कार्यालयांनाच विसर, पश्चिम दृतगती मार्गावर रस्त्याच्या मध्येच जाहिरातीचे फलक
Is Wadala area in Nashik municipal area marchers questions
वडाळा परिसर नाशिक मनपा क्षेत्रात आहे का? पाणी पुरवठ्यासह समस्याग्रस्त मोर्चेकऱ्यांचा प्रश्न
Navi Mumbai, Indira Niwas, unauthorized building collapse, Shahabaz village, Belapur, Mahesh Kumbhar, Sharad Waghmare,
दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या जागा मालकाला अटक, विकासक अद्याप फरार; शोध सुरूच
Pimpri, Potholes, roads, Pimpri latest news
शहरबात… पिंपरी : खड्डेमय उद्योगनगरीची ‘रस्तामुक्त’ फरफट! ‘खड्डेच खड्डे चोहीकडे, गेला रस्ता कुणीकडे’
Two-Wheeler Ambulances| Integrated Tribal Development Project| Bhamragad Taluka, Technical Unsuitability|Tribal Health Crisis,
प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्याकडून शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी? धुळखात पडलेल्या दुचाकी रुग्णवाहिकेच्या…
At the Tuition Center in Old Rajendra Nagar area of ​​Capital Delhi The civic body is responsible for the accident
कर्तव्यात कसूरच, हे सर्वांचे अपयश! दिल्ली महापालिका अधिकाऱ्याची कबुली

हेही वाचा…नेरुळमध्ये आढळलेल्या दुर्मीळ सागरी पक्ष्याचा मृत्यू

भाईंदरमधील उत्तन नाका ते मनोरी तलावापर्यंत मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बगगाड्या येत असतात. मात्र मनोरीतील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे बसगाड्या रस्त्यात अडकून पडण्याच्या घटना गेल्या आठवड्यात दोनदा घडल्या. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे व माती, चिखल यामुळे बसचे ब्रेक नीट लागत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, असे पत्र मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी बससेवा देणाऱ्या महालक्ष्मी सिटीबस ऑपरेटर संस्थेने मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाला दिले आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाला याबाबत सांगून तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा या मार्गावरील बसगाड्या बंद कराव्या लागतील असाही इशारा या पत्रात बससेवा देणाऱ्या संस्थेने दिला आहे.

हेही वाचा…७५ वर्षापासूनची बेस्ट उपक्रमाची सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर, बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाचवण्यासाठी ‘बेस्ट बचाओ’कडून पुढाकार

दरम्यान, या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचे सूचना देणारे फलकही न लावल्यामुळे रहिवाशांमध्येही नाराजी आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात येथील रहिवाशांनीच वाहनचालकांना सूचना देणारे फलक लावल्याची माहिती येथील रहिवासी स्वीट्सी हेनरी यांनी दिली.