मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर येथील वसाहतीत २०१९ मध्ये संरक्षक भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला तीन वर्षे झाली, तरी तेथील सर्व रहिवाशांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. एकूण १५५ झोपडीधारकांपैकी ७३ झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. वनखात्याच्या जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसन रखडल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून रहिवासी येथे राहत आहेत.

मालाड भिंत दुर्घटना : मृतांचा आकडा २६ वर पोहचला

Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
lokmanas
लोकमानस: महागड्या गृहसंकुलांतही तेच…
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
Car, ST buses hit, flyover , Nagpur,
नागपुरात उड्डाणपुलाखाली कार, एसटी बसेस परस्परांवर धडकल्या, ९ प्रवासी जखमी
pcmc issue seized notice to Hotels hospitals schools and educational institutions over property tax arrears
पिंपरी : थकबाकी असलेले हॉटेल, रुग्णालय, शाळा होणार जप्त
koliwada villagers closes jnpa sea channel for rehabilitation
जेएनपीए विस्थापित कोळीवाडा ग्रामस्थ पुन्हा आक्रमक; पुर्नवसनासाठी जेएनपीए समुद्र चॅनेल बंद केले
Residents oppose advertisement boards mumbai Coastal road environment
सागरी किनारा मार्ग परिसरात जाहिरात फलक लावण्यास राहिवाशांचा विरोध, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप

मालाड पूर्वेकडील आंबेडकर नगर व पिंपरी पाडा परिसरात मालाड जलाशयाचे रक्षण करण्यासाठी पालिकेने बांधलेली २.३ किलोमीटरची भिंत १ जुलै २०१९ रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीने ढासळली. भिंतीच्या मागे जमा झालेले पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरले. त्याचबरोबर भिंतीखाली अनेक झोपड्या दबल्या गेल्या तर अनेक वाहून गेल्या. या घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला, तर १३० हून अधिक जण जखमी झाले होते.

पालिका व वनखाते या दोन प्राधिकरणांमध्ये वादही रंगला होता –

पालिकेने या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. तसेच या दुर्घटनेनंतर येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरू लागली. वनखात्याच्या जमिनीवर या झोपड्या असल्यामुळे पालिका व वनखाते या दोन प्राधिकरणांमध्ये वादही रंगला होता. त्यावेळी प्रशासनाने १५५ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे ठरविले होते. परंतु ८२ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आणि ७३ झोपडीधारकांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन –

उर्वरित नागरिकांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे मालाडमधील माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांच्यासह भाजपाच्या माजी नगरसेवकांनी स्थानिक नागरिकांसह महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

Story img Loader