मालाड पूर्वेकडील पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर येथील वसाहतीत २०१९ मध्ये संरक्षक भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला तीन वर्षे झाली, तरी तेथील सर्व रहिवाशांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. एकूण १५५ झोपडीधारकांपैकी ७३ झोपडीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. वनखात्याच्या जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसन रखडल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून रहिवासी येथे राहत आहेत.

मालाड भिंत दुर्घटना : मृतांचा आकडा २६ वर पोहचला

Gang rape in Bopdev Ghat triggers safety concerns
असुरक्षित टेकड्या; भयभीत पुणेकर
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
tigers existence in sahyadri belt
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात आठ वाघांचे अस्तित्व
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
Leopard Nate area, Ratnagiri, Leopard, loksatta news,
रत्नागिरी : नाटे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत, विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश
Deonar Pada cemetery, Deonar Pada cemetery lights,
मुंबई : देवनार पाडा स्मशानभूमी अंधारात, विजेचे दिवे बंद असल्याने नागरीकांना मनस्ताप
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..

मालाड पूर्वेकडील आंबेडकर नगर व पिंपरी पाडा परिसरात मालाड जलाशयाचे रक्षण करण्यासाठी पालिकेने बांधलेली २.३ किलोमीटरची भिंत १ जुलै २०१९ रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीने ढासळली. भिंतीच्या मागे जमा झालेले पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरले. त्याचबरोबर भिंतीखाली अनेक झोपड्या दबल्या गेल्या तर अनेक वाहून गेल्या. या घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला, तर १३० हून अधिक जण जखमी झाले होते.

पालिका व वनखाते या दोन प्राधिकरणांमध्ये वादही रंगला होता –

पालिकेने या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली होती. तसेच या दुर्घटनेनंतर येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरू लागली. वनखात्याच्या जमिनीवर या झोपड्या असल्यामुळे पालिका व वनखाते या दोन प्राधिकरणांमध्ये वादही रंगला होता. त्यावेळी प्रशासनाने १५५ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे ठरविले होते. परंतु ८२ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आणि ७३ झोपडीधारकांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन –

उर्वरित नागरिकांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे मालाडमधील माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांच्यासह भाजपाच्या माजी नगरसेवकांनी स्थानिक नागरिकांसह महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.