लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई वसाहतीतील शांती सागर इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले होते. धुरामुळे १३ जण  गुदमरले असून यापैकी १२ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाला उपचार करून घरी पाठविण्यात आले.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण
Cyber scam mumbai women nude pictures
Cyber scam: सायबर चोरट्यांनी हद्दच केली, मुंबईतील वकील महिलेला चौकशीच्या नावाखाली विवस्त्र होण्यास भाग पाडलं
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Lalbaugcha raja 2024 darshan mumbai devotees get pushed shoved at lalbaugcha raja amid stampede like situation
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?
appoint developers to construct houses in slum Redevelopment Mumbai news
दोन लाख झोपु घरांची जबाबदारी पुन्हा विकासकांवरच?

शांती सागर या सात मजली इमारतीच्या तळमजल्यावरील विद्युत यंत्रणेत शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. आग विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने आगीचा भडका उडाला. आगीमुळे संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य हाती घेतले. मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने अनेक रहिवासी इमारतीत अडकले होते. तसेच, अग्निशामकांनाही धुरामुळे बचावकार्य करण्यात अडथळे येत होते. अग्निशमन दलातील जवानांनी इमारतीच्या विविध मजल्यावर अडकलेल्या जवळपास ८० ते ९० जणांना जिन्यावरून सुरक्षित बाहेर काढले. या दुर्घटनेत हर्षा भिसे (३५), स्विटी कदम (३५), जानवी राईगावकर (१७), प्रियांका काळे (३०), जसिम सय्यद (१७), ज्योती राईगावकर (३२), फिरोजा शेख (३५), लक्ष्मी कदम (५०), मानसी श्रीवास्तव (२४), अक्षरा दाते (१९), अबिद शाह (२२), अमीर खान (२७) आदी गुदमरले. त्यांना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर आमिर खान यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. उर्वरित १२ जमांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.