मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न ऐरणीवर असताना राज्य सरकारकडून हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप करून आता गिरणी कामगार आणि त्यांचे वारस पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. उद्या, मंगळवारी गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांचा आझाद मैदानावर मोर्चा धडकणार आहे. दीड लाख गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी राज्य सरकारकडून कोणती पाऊले उचलली जात आहेत? या कामगारांना केव्हा घरे मिळणार? याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.  यावेळी प्राधान्याने कामगारांना मुंबईतच घरे द्यावी अशीही आग्रही मागणी कामागरांची राहणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई: प्रेमसंबंधातील वादातून तरूणीचा खून, आरोपीला अटक

Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
How To Clean Water Tanki Before Monsoon
१० रुपयांत टाकीतला गाळ करा गायब, पाणी नेहमी राहील स्वच्छ; टाकीत उतरण्याची पण गरज नाही, सहज जुगाडाचा Video पाहा
Meta AI in whatsapp
Meta AI in WhatsApp: आता AI थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर; वाट्टेल ते विचारा, ते सगळं सांगेल! वाचा नेमकं वापरायचं कसं?

पावणे दोन लाख गिरणी कामगारांचे घरांसाठी अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील २५ हजार कामगारांनाच राज्य सरकार घरे देऊ शकत आहे. उर्वरित दीड लाख गिरणी कामगारांसाठी घरेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे या दीड लाख कामगारांच्या घरांचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्व कामगारांना घरे देऊ, त्यांना पंतप्रधान आवास योजनेसह इतर योजनेतील घरे देऊ यासह अनेक आश्वासन दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात घरे देण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले राज्य सरकारकडून उचलली जात नाहीत. दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांसाठी ठोस धोरण आखत त्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी गिरणी कामगार संघटनांकडून केली जात आहे. मात्र याकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याचे म्हणत आता गिरणी कामगार संघर्ष समितीने राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी मंगळवारी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे.

घरांसाठी सुरुवातीपासून गिरणी कामगारांना संघर्ष करावा लागत आहे. या पुढेही संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मंगळवारी कामगारांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता आझाद मैदान येथे हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.