लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध रांगा… तिरंग्याला मानवंदना देत होणारे संचलन… स्वातंत्र्यदिनी सर्वच शाळांमधील हे चित्र यंदाही दिसेल, मात्र त्याचा अविभाज्य भाग असलेल्या गणवेशाची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल… बहुतांशशाळांपर्यंत अद्यापही गणवेश पोहोचलेला नसल्याने ही परिस्थिती उद्भविली आहे.

Maharashtra: 784 percent schools in state now have computer facilities, says report
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक वाचन, गणित विषयात प्रगती, शालेय शिक्षण विभागाचा दावा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
students and teacher gave each other a special gift
VIDEO : ‘मॅडम ही रील करायला तयार झाल्या…’ शाळेच्या शेवटच्या दिवशी ‘त्यांनी’ एकमेकांना दिलं खास गिफ्ट; भावूक झाले विद्यार्थी
loksatta anvyarth quality of school students has deteriorated clear from the asar survey
अन्वयार्थ: कोविडोत्तर निरीक्षणांच्या इयत्ताबदलाचा ‘असर’!
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
Devendra Fadnavis expressed regret over the chaos happening in universities Nagpur news
मुख्यमंत्रीच म्हणतात, विद्यापीठांमध्ये अराजकतेचे बिजारोपण…कारण, माओवादी विचार…
How to relieve discomfort in generation
अस्वस्थता रिचवायची आहे…
Viral Video Shows School Memories
मन अजूनही शाळेत! साफसफाई करताना ‘तिला’ सापडली आठवणींची पेटी; VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील ‘ते’ दिवस

दरवर्षी शालेय स्तरावर होणारी गणवेश खरेदीची पद्धत मोडीत काढून राज्याच्या पातळीवर एकच गणवेश लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. कंत्राटदार पद्माचंद मिलापचंद जैन यांनी कापलेले कापड गट शिक्षणाधिकारी कार्यालयास पुरवून त्यानंतर स्थानिक महिला बचत गटांद्वारे गणवेश शिवून शाळेत द्यायचे आहेत. मात्र, अद्यापही गणवेश शाळांपर्यंत पोहोचलेले नाहीत. अपवाद वगळता बहुतेक शाळांना गणवेश मिळालेले नसून अनेक शाळा तर अद्याप १०० रुपयांत गणवेश शिवून देणाऱ्या बचतगटांच्या शोधात आहेत. काही ठिकाणी एकाच गटाला तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांचे गणवेश शिवण्याचे कंत्राट देण्यात आल्याने काम रखडले आहे. गणवेशाअभावी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना साध्या कपड्यांमध्येच ध्वजवंदनाला जावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे. काही शाळांमध्ये गणवेश मिळाले असले तरी मळखाऊ रंग, कापडाचा दर्जा याबाबत पालक आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गणवेशाच्या मापातही गोंधळ आहेत. त्यामुळे आलेले गणवेश विद्यार्थ्यांना व्हावेत, यासाठी दुरुस्ती करावी लागणार असल्याची तक्रार आहे.

हेही वाचा >>>मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत, ठाकरे गट आणि अभाविपत लढत

सोमवारी सायंकाळपर्यंत गणवेश मिळाले नसल्याचे जळगाव, लातूर, पालघर, सोलापूर, नागपूर, हिंगोली, पुणे, नगर, नाशिक, रायगड या जिल्ह्यांतील शिक्षकांनी सांगितले.

●गणवेशासाठी पालकांनी शिक्षकांकडे तगादा लावला आहे. काही शाळांमध्ये गेल्यावर्षीचा गणवेश घालून विद्यार्थी येत आहेत.

●काही गरीब कुटुंबांमध्ये तर शाळेतून मिळणारा गणवेश हेच मुलांसाठी ‘नवे कपडे’ असतात. ही बाब लक्षात घेऊन शाळा रंगिबेरंगी गणवेश निवडत असत.

●त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही नव्या गणवेशाची उत्सुकता असे. यंदा मात्र विद्यार्थ्यांचा संपूर्ण विरस झाला आहे.

Story img Loader