शिंदे-फडणवीस सरकारने राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली धर्माबाहेर लग्न केलेल्या मुली आणि त्यांच्या कुटुंबात संवाद ठेवण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती‘ असं या समितीचं नाव आहे. या समितीत मंत्री मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्य असणार आहेत. यावर बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी दिल्लीत निर्घृण हत्या झालेल्या श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख करत समितीचे उद्देश सांगितले. ते बुधवारी (१४ डिसेंबर) माध्यमांशी बोलत होते.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, “या समितीचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. आंतरधर्मीय विवाहानंतर ज्या मुला-मुलींचा आपल्या कुटुंबाशी संवाद थांबला त्यांच्यासाठी ही समिती आहे. त्या मुला-मुलींना कोणाला काही सांगावासं वाटलं तर त्यांच्यासाठी ही समिती आहे. आंतरधर्मीय विवाहानंतर कोणाला वाटलं की, मला परत कुटुंबाकडे परत जायचं आहे, तर ते या समितीशी संपर्क करू शकतात. आम्ही त्यांची मदत करू.”

Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?
Why did Chief Minister Devendra Fadnavis immediately take note of Eknath Shindes displeasure
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल कशामुळे घेतली ?

सरकार पालकत्वाच्या नाही, तर संवादकाच्या भूमिकेत राहणार आहे. ही समिती १५ दिवसांमध्ये एक हेल्पलाईन जाहीर करेल. ज्यांना मदत हवी आहे ते यावर संपर्क करू शकता.

समितीचं काम काय असणार?

ही समिती नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत आंतरधर्मीय विवाहाच्या नोंदी ठेवेल. तसेच मुद्रांक शुल्क विभागाकडून आंतरधर्मीय विवाहांची संपूर्ण माहिती घेतली जाईल. याशिवाय अशा लग्नानंतर नवविवाहित तरुण आणि त्यांचे कुटुंबीय संपर्कात आहेत की नाही याची माहिती गोळ करेल.

हेही वाचा : VIDEO: “अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झालेत आणि…”, ‘लव्ह जिहाद’वर बोलताना संजय राऊतांचं मोठं विधान

दरम्यान, श्रद्धा वालकर खून प्रकरणानंतर राज्यात हिंदुत्ववादी संघटनांनी अनेक ठिकाणी मोर्चे काढले. तसेच कथिक लव्ह जिहादचा आरोप करत त्याविरोधी कायद्याची मागणी केली. यानंतर आता आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.

Story img Loader