लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारने २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मात्र मुंबईत २०२३ मध्ये तब्बल ६३ हजारांहून अधिक नवीन क्षयरुग्ण आढळले असून, दोन हजारांहून अधिक क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने क्षयमुक्तीबाबत केलेली घोषणा मुंबईत धूसर बनू लागली आहे.

Japanese Man Sleeps 30 Minutes a Day for 12 Years| How Much Sleep Human Body Need in Marathi
गेल्या १२ वर्षांपासून रोज फक्त ३० मिनिटे झोपतो ‘हा’ जपानी माणूस! शरीरावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांचा खुलासा….
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
In Pune the number of chikunguniya patients has doubled with dengue
पुण्यात डेंग्यूसोबत चिकुनगुन्याचा ‘ताप’! रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; आरोग्य विभाग धास्तावला
bank total debt burden at the end of july crosses 9 lakh crores
बँकांकडूनच वाढती उसनवारी! जुलैअखेर एकूण कर्जभार ९ लाख कोटींपुढे
A drop in the number of patients due to the protest of doctors protesting the Kolkata incident Mumbai news
डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णसंख्येत घट; महानगरपालिका रुग्णालयांतील रुग्णांची संख्या हजाराच्या घरात
1 41 lakh crore loans written off by State Bank of india
स्टेट बँकेकडून १.४१ लाख कोटींची कर्जे निर्लेखित; आठ वर्षांत बड्या थकबाकीदारांकडून केवळ १२ टक्के वसुली
State Banks loans worth lakhs of crores were written off recovering only 12 per cent from large defaulters
स्टेट बँकेचे लाखो कोटींच्या कर्जावर पाणी! बड्या थकबाकीदारांकडून केवळ १२ टक्के वसुली
Inflation hits five year low 3.54 percent in July Food prices fall by half
महागाई दराचा पंचवार्षिक नीचांक, जुलैमध्ये ३.५४ टक्के; खाद्यान्नांच्या किमतीत निम्म्याने घसरण

गतवर्षी मुंबईमध्ये तब्बल ६३ हजार ६४४ नव्या क्षयरोग रुग्णांची केंद्र सरकारच्या निक्षय प्रणालीवर नोंद झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. यावरून मुंबईत प्रत्येक तासाला साधारणपणे क्षयरोगाचे सात रुग्ण सापडत आहेत. तसेच २ हजार १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. क्षयरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असताना गतवर्षी फक्त १० हजार ९१३ रुग्णांनी क्षयरोगावर मात केली आहे.

आणखी वाचा-नव्या वर्षात मुंबईतील १० हजार ४६७ घरांची विक्री

क्षयरोग रुग्णावर उपचार सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर फुफ्फुसाव्यतिरिक्त अन्य प्रकारच्या क्षयरोगासाठी नऊ महिने आणि औषध प्रतिरोधी क्षयरोग रुग्णांसाठी दोन वर्षांनंतर त्यांच्या आजाराचे आकलन करण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे रुग्ण बरे होण्यात मदत होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. एचआयव्ही झालेल्या रुग्णांमधील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत असल्याने त्यांना क्षयरोग होण्याचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे कुपोषिक बालकांना क्षयरोग होण्याचा धोका तीन पट अधिक असतो.

क्षयरोग रुग्णांचा मृत्यू अन्य कोणत्याही कारणाने होऊ शकतो. मात्र असे असले तरी त्या रुग्णाचा क्षयरोगाने मृत्यू झाल्याची नोंद होते. त्यामुळे क्षयरोग रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक दिसून येते. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के इतके आहे. निक्षयवर नोंदणी झाल्यानंतर ती अद्ययावत होण्यासाठी वेळ लागत असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.