मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी – आमणे या शेवटच्या टप्प्यातील कामाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वेग दिला आहे. या शेवटच्या टप्प्याचे ९७ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा टप्पा वाहूतक सेवेत दाखल करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा मानस आहे.

‘एमएसआरडीसी’च्या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावरील नागपूर – इगतपूरी दरम्यानचा ६२५ किमी लांबीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. तर इगतपुरी – आमणे या शेवटच्या टप्प्यातील ७५ किमीच्या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. हा टप्पा या आधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि आव्हानात्मक कामामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागत असल्याचे ‘एमएसआरडीसी’चे म्हणणे आहे.

Rajewadi Station , Purandar Airport ,
पुणे : राजेवाडी स्थानकापासून पुरंदर विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका, एकात्मिक वाहतूक आराखड्यात प्रकल्प प्रस्तावित
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
Tax issues with companies take contract of Mumbai Goa highway work
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांनी शासनाचा साडे नऊ कोटी रुपये  कर थकविला
Construction of Vadhavan Igatpuri highway to be handed over to NHAI Mumbai news
वाढवण-इगतपुरी महामार्गात निधीटंचाईचा ‘गतिरोधक’; संपूर्ण महामार्गच ‘एनएचएआय’कडे देण्याचा मुख्य सचिवांच्या बैठकीत सूर
ubt loyal former corporator rajul patel join shinde shiv sena
पहाडी गोरेगावमधील ३५ मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण; मार्च अखेरपर्यंत निवासी दाखला मिळवण्याचे म्हाडाचे नियोजन
Traffic jam on the old Pune to Mumbai highway Pune news
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

हेही वाचा : मुंबई पुढील दोन – तीन तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्याआधी हा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याला ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दुजोरा दिला.

समृद्धी महामार्ग ठाण्यातील आमणे येथे येऊन संपणार असला तरी आता पुढे हा महामार्ग मुंबई – वडोदरा महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यानुसार इगतपुरी – शांग्रीला रिसॉर्ट, भिवंडी असा काही किमी लांबीच्या रस्त्याचेही काम ‘एमएसआरडीसी’ करीत आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये इगतपुरी – आमणे आणि आमणे – शांग्रीला रिसॉर्ट, भिवंडी दरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल होईल. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस नागपुर – मुंबई प्रवास आठ तासात पार करणे शक्य होईल.

हेही वाचा : Modi In Mumbai: रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यानंतर मोदी आज मुंबईत; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन; वाचा यादी!

भेगांची दुरूस्ती सुरू

समृद्धी महामार्गामुळे प्रवास अतिवेगवान झाला आहे. मात्र अपघात आणि दुर्घटनांमुळे महामार्ग चर्चेत आला आहे. नुकत्याच या महामार्गावरील छत्रपती संभाजी नगरजवळील रस्त्याला ४० मीटर लांबीच्या भेगा पडल्या आहेत. तर याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या शहापूर येथील निर्माणाधीन जोडरस्ता पुलावर भगदाड पडले आहे. दोन्ही ठिकाणच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे.

Story img Loader