मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी – आमणे या शेवटच्या टप्प्यातील कामाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वेग दिला आहे. या शेवटच्या टप्प्याचे ९७ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा टप्पा वाहूतक सेवेत दाखल करण्याचा ‘एमएसआरडीसी’चा मानस आहे.

‘एमएसआरडीसी’च्या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावरील नागपूर – इगतपूरी दरम्यानचा ६२५ किमी लांबीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. तर इगतपुरी – आमणे या शेवटच्या टप्प्यातील ७५ किमीच्या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. हा टप्पा या आधीच वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि आव्हानात्मक कामामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागत असल्याचे ‘एमएसआरडीसी’चे म्हणणे आहे.

Traffic jam due to repair work on flyover on Mumbai Agra highway nashik news
उड्डाणपुलावरील दुरुस्ती कामामुळे गोंधळ; पूर्वकल्पना नसल्याने वाहनधारकांची गैरसोय, वाहतूक कोंडीत भर
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
PM Modi inaugurates Rs 11200 crore projects in Maharashtra
आचारसंहितेपूर्वी उद्घाटनांचा धडाका;‘डबल इंजिन’मुळे राज्याच्या विकासाला गती- मोदी
Textile project of Reliance in Palghar
पालघरमध्ये रिलायन्सचा वस्त्रोद्याोग प्रकल्प; जमिनीच्या हस्तांतरासाठी एमआयडीसीचा अर्ज, दर मात्र गुलदस्त्यात
CCTV, Thane district, Thane, Thane latest news,
ठाणे : जिल्ह्यातील सीसीटीव्हीची प्रतिक्षाच
Dead fish gifted to Chief Engineer of Environment Department
पिंपरी : …अन् पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट
Development of 39 agar station sites of ST on commercial basis Print politics news
‘एसटी’च्या ३९ जागांचा व्यापारी तत्त्वावर विकास; भाडेपट्ट्याच्या कालावधीसह चटईक्षेत्र निर्देशांकात वाढ
mcoca action, Praveen Madikhambe, Loni Kalbhor,
लोणी काळभोरमधील ‘ऑइल माफिया’ प्रवीण मडीखांबेसह साथीदारांवर मोक्का कारवाई, पेट्रोल-डिझेल चोरीतून कोट्यवधींची संपत्ती

हेही वाचा : मुंबई पुढील दोन – तीन तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्याआधी हा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याला ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दुजोरा दिला.

समृद्धी महामार्ग ठाण्यातील आमणे येथे येऊन संपणार असला तरी आता पुढे हा महामार्ग मुंबई – वडोदरा महामार्गाला जोडण्यात येणार आहे. त्यानुसार इगतपुरी – शांग्रीला रिसॉर्ट, भिवंडी असा काही किमी लांबीच्या रस्त्याचेही काम ‘एमएसआरडीसी’ करीत आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये इगतपुरी – आमणे आणि आमणे – शांग्रीला रिसॉर्ट, भिवंडी दरम्यानचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल होईल. त्यामुळे सप्टेंबरअखेरीस नागपुर – मुंबई प्रवास आठ तासात पार करणे शक्य होईल.

हेही वाचा : Modi In Mumbai: रशिया-ऑस्ट्रिया दौऱ्यानंतर मोदी आज मुंबईत; २९ हजार कोटींच्या प्रकल्पांचं करणार उद्घाटन; वाचा यादी!

भेगांची दुरूस्ती सुरू

समृद्धी महामार्गामुळे प्रवास अतिवेगवान झाला आहे. मात्र अपघात आणि दुर्घटनांमुळे महामार्ग चर्चेत आला आहे. नुकत्याच या महामार्गावरील छत्रपती संभाजी नगरजवळील रस्त्याला ४० मीटर लांबीच्या भेगा पडल्या आहेत. तर याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या शहापूर येथील निर्माणाधीन जोडरस्ता पुलावर भगदाड पडले आहे. दोन्ही ठिकाणच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे.