मुंबई : वाढती महागाई आणि लहान मुलांमधील मोबाइलचा वाढता वापर यामुळे पतंग व्यवसायावर संक्रात आली आहे. गेली काही वर्षे सातत्याने वाढत असलेली महागाई आणि मोबाइलच्या अतिवापरामुळे यंदा पतंग विक्रीच्या व्यवसायात सुमारे ४० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला असून, पुढील काही वर्षांमध्ये मुंबईतील पतंग व्यवसाय ठप्प होण्याची भीती डोंगरी परिसरातील पतंग विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईमध्ये साधारणपणे ऑगस्टपासून पतंग उडविण्याला सुरुवात होते. मकर संक्रांतीच्या दिवशी बहुतांश मंडळी पतंग उडविण्यात दंग असतात. पतंग विक्रीच्या व्यवसायाला ऑगस्टपासून सुरुवात होत असे. मात्र, आता डिसेंबरमध्ये पतंग विक्रीला सुरुवात होते. मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे पतंग उडविण्याकडे नागरिकांचा कल कमी झाला आहे. महागाईमुळे या व्यवसायीकांचे कंबरडे मोडले आहे. पूर्वी मोठ्यांबरोबरच लहान मुलांचा पतंग उडविण्याकडे अधिक कल असायचा.

whatsapp special campaign focused on small businesses
छोट्या व्यवसायांवर केंद्रित ‘व्हॉट्सॲप’ची विशेष मोहीम
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
e vehicle prices will remain under control even without subsidy says nitin gadkari
अनुदानाविनाही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील -गडकरी
Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
cases of dengue, Mumbai, chikungunya, lepto,
मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ
Growth in major sectors of india marathi news
देशातील प्रमुख क्षेत्रांतील वाढ जुलैमध्ये ६.१ टक्क्यांवर मर्यादित
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
Navi Mumbai, price garlic,
नवी मुंबई : लसणाच्या दरात तेजी, घाऊक बाजारात प्रतिकिलो ४०० रुपयांवर

हेही वाचा…भारतातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेच्या deposits मध्ये तब्बल पाच हजार कोटींची घट

मात्र लहान मुले मोबाइलमध्ये दंग होत असून त्यांना मैदानी खेळांऐवजी मोबाइलमधील खेळ आवडू लागले आहेत. क्रिकेट वगळता कोणताही खेळ खेळताना मुले दिसत नाही. मुले पतंगासाठी हट्ट करत नाहीत आणि पतंग उडवणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवण्याचा पालकांचा त्रास कमी झाला आहे. त्याचा परिणाम पतंग व्यवसायावर होताना दिसत असल्याची माहिती डोंगरी काईट सेंटरचे मालक मोहम्मद मलिक अन्सारी यांनी दिली. मुंबईतील वाढत्या टॉवर संस्कृतीमुळे अनेक मुले घरातून बाहेर पडत नाही, तसेच टॉवरच्या गच्चीवरून पतंग उडविण्यास परवानगी दिली जात नाही.त्यामुळे टॉवरमध्ये राहणारी मुले पतंग खरेदीसाठी कमी येतात. याउलट गोवंडी, मानखूर्द, कुर्ला येथील झोपडपट्ट्यांमधील मुले पतंग खरेदीसाठी येत असल्याचे अन्सारी यांनी सांगितले.

वाढती महागाई, सरकारकडून घालण्यात येणारी बंदी, मुंबईत उभे राहणारे टॉवर आणि लहान मुलांमधील मोबाइलच्या वाढत्या वापराचा परिणाम पतंग व्यवसायावर होत आहे. वाढत्या महागाईमुळे काही वर्षांपूर्वी एक रुपयाला मिळणारी पतंग आता पाच रुपयांना मिळत आहे. त्यामुळे पूर्वी मकर संक्रांतीसाठी साधारणपणे दोन ते तीन हजार रुपयांच्या पतंग विकत घेणारी व्यक्ती आता १००० रुपयांच्या पतंग व मांजा घेण्यासाठीही अनेकदा विचार करत आहेत.

हेही वाचा…मुंबई महानगरात महायुतीचा ‘राम-सेतू’ पॅटर्न

पतंग उडविण्यासाठी मोकळी जागा असणे आवश्यक असते. मात्र मुंबईमधील मैदाने नष्ट होऊन उभे राहत असलेल्या टॉवरमुळे पतंग उडविताच येत नाहीत. तसेच लहान मुलांमध्ये मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे पतंग खरेदी करण्याकडे पालकांचा कल कमी होत आहे. अशा अनेक समस्यांचा पतंग व्यवयाय सामना करत असताना राज्य सरकारकडून मांजाच्या वापरावर निर्बंध घालण्यात आल्याने पतंग व्यवसायाला घरघर लागली असल्याचे इंडियन फायटर काईट्सचे मालक ए.आर.खान यांनी सांगितले.

पूर्वी ऑगस्टपासून पतंगांची विक्री होत असे, मात्र आता फक्त जानेवारीच्या १५ दिवसांमध्येच पतंगाची विक्री होते. त्यातही यंदा दोन दिवसांवर मकर संक्रांत आली तरी अद्याप फारसे ग्राहक पतंग खरेदीसाठी आलेले नाहीत. मागील काही वर्षांमध्ये पतंग व्यवसायामध्ये ४० टक्क्यांनी घट झाली आहे.

नव्या पीढीची व्यवसायाकडे पाठ

पूर्वी ऑगस्टपासून चालणारा हा व्यवसाय आता फक्त मकर संक्रातीपुरताच चालतो. त्यामुळे वर्षभर पतंग सांभाळून ठेवणे, कमी होणारा व्यवसाय, कामगारांचे वेतन, दुकानातील अन्य खर्च यानंतरही जानेवारीमध्ये पतंग विक्री होण्याची शक्यता कमी यामुळे हा व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे या व्यवसायामध्ये नवीन पीढी येण्यास तयार नाही. परिणामी पुढील आठ ते १० वर्षांनंतर मुंबईमधील पतंग व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता पतंग व्यवसायिकांनी वर्तवली.

हेही वाचा…पैसे देऊन चूक माफ केली जाऊ शकत नाही, अग्निसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी उच्च न्यायालयाचे महापालिकेला खडेबोल

पतंगाच्या किमती

साधा पतंग – ५ रुपये

काटॅूनची पतंग – १० रुपये

साधा फॅन्सी पतंग – ७० रुपये

मेटॅलिक पतंग – १० रुपये

मेटॅलिक फॅन्सी पतंग – १२० रुपये

ढाल – १०० रुपये

चायनीज पतंग – १२० रुपये

१ कोडी (२० साधा पतंग) – ६० रुपये

१ कोडी (२० प्लास्टिक पतंग) – १०० रुपये

मांजाच्या किमती

१०० मीटर – ३० रुपये

१००० मीटर – ४०० रुपयांपासून