मुंबई : जागतिक स्तरावर ८१ लाख मृत्यू वायू प्रदूषणामुळे होत असून त्यातील २५ टक्क्यांहून अधिक म्हणजेच २० लाखांहून अधिक मृत्यू भारतात होत असल्याचे अर्थ ग्लोबलच्या अहवालातून समोर आले आहे. तसेच जगातील १५ सर्वात प्रदूषित शहरांपैकी १२ शहरे ही भारतातील असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अर्थ ग्लोबल ही मुंबई आणि लंडन स्थित एक संशोधन संस्था भारतातील वायू प्रदूषणासंदर्भात विविध पातळीवर सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करते. दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. या पार्श्वभूमीवर अर्थ ग्लोबलने नोव्हेंबर २०२४ मध्ये वायू प्रदूषणासंदर्भात इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स (आयव्हीआर) प्रणाली वापरून देशभर सर्वेक्षण केले होते. त्यात बिहार, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. सर्वेक्षण अहवालानुसार श्वसनाच्या संसर्गामुळे होणारे ३० टक्के मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा