अमिताभ बच्चन यांना २०१७ साली रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत नोटिस बजावली होती. त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मग मुंबई महानगरपालिकेने कुठलीच कारवाई का केली नाही, असा सवास काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी उपस्थित केला आहे.

रस्ता रुंदीकरण मोहिमेच्या अंतर्गत अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा या बंगल्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणासाठी देण्याची नोटीस त्यांना २०१७ साली पाठवण्यात आली होती. २०१९ मध्ये मुंबई महापालिकेने बंगल्याची हद्द सूचित करणारी भिंत हटवण्यात आली होती. मात्र त्यांच्या बंगल्याला काहीही करण्यात आलं नव्हतं. काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आणलं आहे. बाकी सर्व जागा पालिकेने ताब्यात घेतली आहे. तर मग बच्चन यांच्या मालकीचीच जागा अजून ताब्यात का घेतली नाही? नोटीस पाठवूनही त्याच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याबरोबर जर कारवाई झाली नाही, तर आम्ही याविरोधात तक्रार करु असा इशाराही मिरांडा यांनी दिला आहे.

loksatta article mahatma Gandhi assassination opposition is left to criticize rss
महात्मा गांधी केवळ संघविरोधासाठीच उरले आहेत?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांना ‘दीवार’ साठी निवडले, त्यावेळी….”, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “राजेश खन्ना…”
RSS Bhaiyyaji Joshi
“अहिंसेच्या रक्षणासाठी हिंसा करावी लागते”, आरएसएस नेते भैय्याजी जोशींचं वाक्तव्य
Amitabh Bachchan recalls how Shatrughan Sinha would make him push his car on Marine Drive
अमिताभ बच्चन यांना कारला धक्का द्यायला सांगायचे शत्रुघ्न सिन्हा; स्वतः केलेला खुलासा, म्हणालेले, “हे महाशय…”
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका


नागरी सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडे प्रकरण पाठवून महापालिका फक्त वेळ घालवत आहे असा आरोपही मिरांडा यांनी केला आहे. मिरांडा यांना उत्तर देताना के-वेस्ट वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एकदा का नागरी सर्वेक्षण विभागाने प्रतिक्षा बंगल्याचा कोणता आणि किती भाग ताब्यात घ्यायचा आहे हे निश्चित केलं की महापालिका त्वरित कारवाई करुन हा भाग ताब्यात घेईल.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी प्रतिक्षा बंगल्याचा अपेक्षित भाग ताब्यात घेण्यासाठीचा विनंती अर्ज डिसेंबर २०१९ मध्ये केला आहे आणि आवश्यक ते शुल्कही भरलं आहे. यासाठीची मोजणी फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेली आहे. या भागाच्या भौगोलिक रचनेमुळे काही अडचणी येत आहेत मात्र या प्रकरणातली सर्व माहिती नागरी सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयाकडे सुपुर्द करण्यात आली असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांकडून कळत आहे.

Story img Loader