मुंबई : देशभरात २०२२ मध्ये एक लाख ९३ हजार ३८५ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२१ च्या तुलनेत त्यात सुमारे ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गंभीर बाब म्हणजे ५० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर सर्वाधिक आर्थिक गुन्ह्यांची मुंबईत नोंद झाली आहे.

हेही वाचा >>> मुंबई : विवाहित प्रेयसीचे अश्लील छायाचित्र काढून १७ लाखांची खंडणी उकळली; आरोपी प्रियकराला अटक

Onion and grain trade stopped due to market committee strike nashik
कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प; बाजार समिती संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
union home minister amit shah remark india will be naxalism free by march 2026
मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त होणार काय? छत्तीसगडमध्ये आक्रमक नक्षलविरोधी कारवायांमुळे गृहमंत्र्यांचे वक्तव्य पुन्हा चर्चेत…
war Iran Israel
विश्लेषण : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध भडकणार का? भारतावर काय परिणाम?
66 people died in floods in Nepal
नेपाळमधील पुरात ६६ जणांचा मृत्यू, ७९ बेपत्ता
Local crime investigation team exposed chain adulterating food spices with harmful dyes and chemicals
धुळे: मसाल्यांमध्ये ही भेसळ करुन लोकांच्या आरोग्याशी खेळ
pakistan beggars export in saudi
पाकिस्तानातून भिकाऱ्यांची निर्यात; सौदी अरेबिया प्रशासनाचं पित्त खवळलं, काय आहे प्रकरण?
nana Patole devendra fadnavis (1)
Nana Patole : “… तर विरोधकही त्या एन्काऊंटरचं समर्थन करतील”, नाना पटोलेंचं राज्य सरकारला थेट आव्हान!

भारतामध्ये २०२० पासून दाखल करण्यात आलेल्या आर्थिक गुन्ह्यांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशात २०२० मध्ये एक लाख ४५ हजार ७५४ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. पुढील वर्षी, म्हणजे २०२१ मध्ये एक लाख ७४ हजार १३ गुन्हे नोंदवण्यात आले. तर, २०२२ मध्ये एक लाख ९३ हजार ३८५ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात फसवणूक, फौजदारी विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी देशभरात एकूण चार लाख ११ हजार ७५२ आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू होता.

देशातील महानगरांचा विचार केल्यास आर्थिक गुन्ह्यांबाबत मुंबई आघाडीवर आहे. एकटय़ा मुंबईत २०२२ मध्ये सहा हजार ९६० आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे सहा हजार १५ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली होती. ५० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीचा विचार केल्यास मुंबई दुसऱ्या तर दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी या प्रकारचे मुंबईत १० तर दिल्लीत १२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये राज्यांत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. राज्यात ५० कोटी अथवा त्यापेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे सर्वाधिक म्हणजे २० गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी पाच गुन्ह्यांमध्ये फसवणुकीची रक्कम १०० कोटींपेक्षा अधिक असल्याचे नोंदवण्यात आले आहे.