मुंबई पालिका निवडणुकांसाठी प्रभागसंख्या नऊने वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राज्य सरकारने प्रभागसंख्या २२७ वरून ३३६ केली होती. या निर्णयाला भाजपा नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालायने ही याचिका फेटाळली असून आज किंवा उद्या तपशीलवार आदेश देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

या निवडणुकांसाठी ओबेसी आरक्षण दिले जाणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाला सांगितलं आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केलं जाईल. तसंच या निवडणुका २०११ सालच्या जनगणनेनुसारच घेण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केलं आहे.

Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
Trains coming from Konkan to Mumbai will run to Dadar instead of CSMT till February 28
कोकणातील रेल्वेगाड्यांची सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत धाव
municipal corporation is setting up animal crematorium at Deonar slaughterhouse is nearing completion
देवनार पशुवधगृहातील प्राण्यांच्या दहनवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात, मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस
national medical commission will form expert committee to improve and standardize PG courses
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता वाढीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करणार,राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून प्राध्यापकांना सहभागी होण्याचे आवाहन
national medical commission will form expert committee to improve and standardize PG courses
आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी २४ वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत, अनेकजण पदोन्नतीशिवायच निवृत्त
govandi Shivaji Nagar Police arrested two drug smugglers and seized 240 bottles of Codeine syrup
गोवंडीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, सव्वा लाखांचा माल जप्त
Mumbai Over 70 percent of 23 8 km Vadape thane highway concreting on mumbai nashik highway is complete
वडपे – ठाणेदरम्यानच्या आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
bmc decided to start 25 more Aapla Dawakhanas and three physiotherapy centers in 2025
मुंबई महानगरपालिका वर्षभरात २५ ‘आपला दवाखाना’ सुरू करणार
Samajwadi Party opposed BMC budget property tax
व्यावसायिक झोपड्यावर मालमत्ता कर आकारण्यास समाजवादी पक्षाचा विरोध, घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्कालाही विरोध

‘मुंबईत पालिका प्रभाग संख्या वाढीचा निर्णय कायदेशीरच’ ; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

मुंबईतील लोकसंख्या २०११ सालच्या जनगणनेनुसार ३.८७ टक्के वाढली होती. त्यानंतरही २०१७ सालच्या निवडणुकांमध्ये प्रभाग संख्या वाढवण्यात आली नाही, परंतु गेल्या दहा वर्षांत मुंबईची लोकसंख्या वाढल्याचे गृहीत धरून त्यानुसार प्रभाग संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकांसाठी प्रभाग संख्या वाढवण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर आम्ही केला असून प्रभागवाढीचा निर्णय कायद्याच्या चौकटीत राहूनच असल्याचा दावा राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात केला. भाजप नगरसेवकांनी प्रभाग संख्या वाढवण्याविरोधात केलेली याचिका दंडासह फेटाळण्याची मागणी केली होती.

अभिजीत सामंत आणि राजश्री शिरवाडकर या भाजपच्या दोन नगरसेवकांनी प्रभाग संख्या २२७ वरून २३६ करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी भारतीय जनगणना आयोगातर्फे दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. परंतु त्याची आकडेवारी लगेचच उपलब्ध होते असे नाही. त्यामुळे त्या आधीच्या जनगणनेच्या आधारे लोकसंख्या किती वाढली यावरून प्रभाग संख्या वाढवणे, आरक्षणाचा निर्णय घेतला जातो.

२०१३ आणि २०१७ साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी २०११ सालच्या जनगणनेच्या आधारे प्रभाग संख्या वाढवण्यात आली नव्हती. परंतु २०११ सालच्या जनगणनेनुसार मुंबई पालिका हद्दीत गेल्या दहा वर्षांत ३.८७ टक्के लोकसंख्या वाढली. गेल्या दहा वर्षांतही ती वाढली असल्याचे गृहीत धरून प्रभाग संख्या वाढवण्याचा अधिकार सरकारला असल्याचा युक्तिवादही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला होता.

Story img Loader