अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी ( २२ जानेवारी ) पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी मोदी सरकारनं जाहीर केली होती. यानंतर शिंदे सरकारनंही २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी मुंबईत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

धार्मिक कार्यक्रमासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणं हे संविधानातील धर्मनिरपेक्षक तत्वांच्या विरोधात आहे, असं म्हणत विद्यार्थ्यांनी शनिवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर रविवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

aishwarya rai nimrat kaur abhishek bachchan
ऐश्वर्या राय बच्चनने पती अभिषेकसाठी केली पोस्ट, चाहते निम्रत कौरचा उल्लेख करत म्हणाले…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Supreme Court On Mahakumbh Stampede
Supreme Court : “ही दुर्दैवी घटना, पण…”, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्याला दिले ‘हे’ आदेश
Pannuns Sikhs for Justice is dangerous to India
खलिस्तानी अतिरेकी पन्नूनची ‘सिख्स फॉर जस्टीस’ संघटना भारतासाठी धोकादायक का आहे?
abhishek lodha and abhinandan lodha
व्यापारचिन्हाबाबतचा वाद मध्यस्थांमार्फत सोडवण्यास लोढा बंधुंची सहमती, माजी न्यायमूर्ती रवींद्रन यांची मध्यस्थी म्हणून नियुक्ती
Sandeep Kshirsagar FB
“धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य”, अजित पवारांच्या त्या प्रतिक्रियेनंतर संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
Supriya sule
Supriya Sule : “अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २४ तासांचा वेळ देऊ”, सुप्रिया सुळेंनी कशासाठी दिला अल्टिमेटम?

हेही वाचा : “हिंदू मंदिरासाठी…”, २२ जानेवारीच्या सुट्टीला विधी शाखेच्या विद्यार्थ्यांकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

“धार्मिकबाबींसाठी सुट्टीची घोषणा हा निर्णय मनमानी असू शकत नाही. सुट्टीचा निर्णय धर्मनिपेक्षक तत्वांशी सुसंगत आहे. राज्यात विविध धर्मांचं पालन केलं जातं. सुट्टीमुळे कलम २५ आणि कलम २६ ला कुठलीही बाधा पोहचत नाही,” असं उच्च न्यायालयानं म्हटलं.

सरकारच्या वतीनं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ युक्तीवाद करताना म्हणाले, “नागरिकांना धार्मिक श्रद्धा बाळगण्याची परवानगी देणं हे धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन होते, असं म्हणता येत नाही. अन्य धर्मियांसाठीही सुट्टी जाहीर केली जाते. त्यामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर करणं ही एक धोरणात्मक बाब आहे. न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करण्यास सांगता येत नाही.”

न्यायालयानं विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना खडेबोल सुनावले आहेत. “राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि प्रसिद्धीपोटी ही जनहित याचिका करण्यात आल्याचं दिसत आहे. ही याचिका दाखल करताना मूलभूत तत्वांचा विचार केला नाही,” असं उच्च न्यायालयानं म्हटलं.

Story img Loader