राज्यात हिट अँड रन अपघाताची प्रकरणे वारंवार घडत आहेत. आज पहाटे वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ भीषण अपघात घडला. एका BMW वाहनाने दुचाकीवर मासळी घेऊन चाललेल्या वरळी कोळीवाड्यातील नाखवा दाम्पत्याला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला १०० मीटरपर्यंत फरफटत गेल्या. त्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर बीएमडब्लू वाहन हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांच्या मालकीचे असल्यामुळे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यानंतर विरोधकांनी पीडितांना न्याय देण्याची मागणी करत शिवसेना शिंदे गटावर टीका केली. आता या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या अपघातानंतर माझी पोलिसांशी चर्चा झाली. कायद्यासमोर सर्वच समान असतात. सरकार सर्वच घटनांना एकसमान पाहते. ही घटना काही वेगळी नाही. आम्ही कुणालाही वाचविण्याचे काम करणार नाही. घडलेली घटना अतिशय दुःखद आहे. असे अपघात पुन्हा घडू नये, असा सरकारचा प्रयत्न असेल. कायद्यानुसार आरोपींवर कारवाई केली जाईल.

Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Eknath shinde bjp loksatta
एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळेच पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती
mahayuti dispute on guardian ministership
विश्लेषण : पालकमंत्रीपदावरून महायुतीत ठिणगी कशासाठी? भाजपवर शिंदे गट नाराज?
Badlapur Sexual Assault Case, Akshay Shinde Encounter Case, Akshay Shinde ,
भाजपच्या सांगण्यावरून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, माजी गृहमंत्र्यांचा थेट आरोप
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस ठाणे गाठून पोलिसांकडून माहिती घेतली. तसेच पीडित नाखवा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विरोधकांचे कामच विरोध करणे आहे. पण आमचे सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. तो आमचा पदाधिकारी असला तरी सर्वांना समान न्याय लागू करण्याचे काम आम्ही करू.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतल्यानंतर माध्यमांशी संवाध साधला. ते म्हणाले, “आज सकाळी वरळीत हिट अँड रनची घटना घडली. या घटनेतील आरोपी चालक फरार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले आहे. या घटनेतील जो तरुण आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे.”

“या घटनेतील आरोपी कोणत्याही पक्षाचा असला, तरी मी या घटनेचे राजकारण करणार नाही. मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही. माझी मागणी आहे की, जो गाडी चालवत होता, त्या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. या घटनेत कुठलाही राजकीय हस्तक्षेप व्हायला नको”, अशी अपेक्षाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

अपघात कसा घडला?

वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ पहाटे ५.३० वाजता अपघात घडला. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात नाखवा दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉक येथे मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या बीएमडब्लू वाहनाने धडक दिली. दुचाकीवर मासळी असल्यामुळे दुचाकी चालवत असलेल्या नाखवा यांचे दुचाकीवर नियंत्रण सुटले. त्यामुळे पती-पत्नी वाहनाच्या बोनेटवर धडकले. वाहनाने ब्रेक मारल्यानंतर नाखवा बाजूला पडले. मात्र त्यांच्या पत्नीला वेळीच बाजूला होता आले नाही. त्यातच बीएमडब्लूच्या चालकाने वाहन पळविल्यामुळे त्या वाहनाबरोबर १०० मीटरपर्यंत फरफटत गेल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Story img Loader