मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल झालेले असले तरी या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सातही धरणांतील पाणीसाठा १८ टक्क्यांवर गेला आहे. पवई परिसरात सर्वाधिक पाऊस पडल्यामुळे मुंबईच्या हद्दीतील तुळशी आणि विहार या जलाशयातील पाणीसाठी चांगलाच वाढला आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे सातत्याने खालावलेला धरणातील पाणीसाठा गेल्या आठवड्याभरातील पावसामुळे वाढू लागला आहे. त्यातच रविवारी पडलेल्या पावसाने भर घातली आहे. त्यामुळे साडेपाच टक्क्यांपर्यंत गेलेला पाणीसाठा आज (८ जुलै) १८.७३ टक्के झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून धरणातील पाणीसाठी वेगाने कमी होत होता. त्यात आता वाढ होऊ लागली आहे. सोमवारी ८ जुलै रोजी सातही धरणांत मिळून दोन लाख दशलक्ष लीटरहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. अद्याप धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत नसला तरी काल रात्रीपासूनच्या पावसाने थोडासा दिलासा दिला आहे.

High Court clarified to file a Public Interest Litigation regarding the pollution of garbage on the beaches of Mumbai print news
अस्वच्छ किनाऱ्यांवरून पालिकेची कानउघाडणी; समुद्रातील ‘प्लास्टिक’ सागरी जीवांवर नाही, तर मानवांवरही दुष्परिणाम
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
There has increase in number of potholes in Dronagiri node of Uran during monsoon
द्रोणागिरी परिसर खड्ड्यांत; पाऊस थांबल्याने मार्गावरील धुळीच्या उधळणीने प्रवासी आणि नागरिक त्रस्त
Roads bad condition Mumbai, heavy rain Mumbai,
मुंबई : जोरदार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था, जलमय भागातील खडी वाहून गेल्याने पुन्हा खड्डे
Sudhir Mungantiwar, tigers, forest,
मुनगंटीवार म्हणतात, जंगलातील वाघांना स्थलांतरित करा..
Mobile thieves pune, Mobile theft pune,
पुणे : विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा धुमाकूळ, ३०० जणांचे मोबाइल चोरी; नाशिक, मध्य प्रदेशातील चोरटे गजाआड
firecrackers banned in delhi
‘या’ राज्यात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी; कारण काय? फटाक्यांमुळे शरीराचे किती नुकसान होते?
vegetable prices increased in pune marathi news
पुणे: भाज्या कडाडल्या, गौरी आगमनानिमित्त भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी

हेही वाचा – “वडील सापडतात, मग मुलगा का नाही?” वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांतील पाणीसाठा वाढत असला तरी गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कमी आहे. सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्षलीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत २ लाख ७१ हजार १४७ दशलक्षलीटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा ७१ हजार दशलक्षलीटरपर्यंत खालावला होता.

धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू करण्यात आली आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये वाढ होईपर्यंत पाणी कपात लागू राहणार आहे.

हेही वाचा – धक्कादायक! लोकल पकडताना महिला पाय घसरुन पडली, अंगावरुन गेली ट्रेन, जीव वाचला पण पाय गमावले

विहार आणि तुळशी तलावात मोठा पाऊस

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी विहार आणि तुळशी तलाव हे दोन तलाव मुंबईच्या हद्दीतच आहेत. या तलावांपैकी विहार तलावात रविवारी दिवसभरात ३६४ मिमी पावसाची नोंद झाली तर तुळशी तलावात २५४ मिमी पावसाची नोंद झाली.

८ जुलै २०२४ – २ हजार ७१ दशलक्ष १४७ लीटर – १८.७३ टक्के
८ जुलै २०२३ – ३ लाख १२ हजार २५१ दशलक्षलीटर – २१.५७ टक्के
८ जुलै २०२२ – ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्षलीटर – २५.९४ टक्के

कोणत्या धरणात किती पाणीसाठा

उर्ध्व वैतरणा – ००
मोडक सागर – ३५.८५ टक्के
तानसा – ४०.६९ टक्के
मध्य वैतरणा – १९.५१ टक्के
भातसा – १६.१३ टक्के
विहार – ३१.७४ टक्के
तुलसी – ४५.५१ टक्के