मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची घडी मंगळवारीही जैसे थेच होती. मध्य रेल्वेवरील लोकल मंगळवारी सकाळपासूनच कूर्मगतीने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना इच्छित वेळेत लोकल मिळत नव्हती. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढत होती. परिणामी, प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. दरम्यान, मध्य रेल्वेवरील लोकल मंगळवारी सकाळपासूनच २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत आहेत. त्यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले आहेत.

हेही वाचा : संलग्न झोपु योजनांसाठी यापुढे परवानगी नाही! मंजूर योजनांना मात्र अभय; पालिकेकडून नरमाईची भूमिका?

Indian railway Shortest train route
‘हा’ आहे देशातील सर्वांत लहान रेल्वे प्रवास, प्रवासासाठी लागतात फक्त नऊ मिनिटे; पण तिकीट भाडे ऐकून बसेल धक्का
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Mumbai Kavach four point zero system will reduce distance between two locales from 180 to 150 seconds
मध्य, पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त ३०० लोकल फेऱ्या, दोन लोकलमधील वेळ कमी होणार
karjat Bhivpuri local trains disrupted
कर्जत – भिवपुरी येथील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा विस्कळीत, कर्जतहून येणाऱ्या काही लोकल रद्द
Karjat CSMT local services delayed morning Kalyan, Dombivli central railway local train services passengers
सकाळच्या कर्जत-सीएसएमटी लोकल न आल्याने कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांमध्ये गोंधळ
western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
Shilpata road remain closed five days February reconstruction work Nilaje railway flyover
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर…

मुंबई शहर, उपनगरांत आणि ठाण्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने उसंत घेतली असून कडक ऊन पडले आहे. त्यामुळे लोकल वेळेत धावणे अपेक्षित होते. मात्र लोकल कूर्मगतीने धावत असल्यामुळे प्रवाशांना विलंब यातना सहन कराव्या लागत आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजेनंतर सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक लोकल दोन स्थानकांदरम्यान रखडलेल्याचे निदर्शनास आले. ठाणे, मुलुंड, भांडुप येथे अप धीम्या लोकल ३० ते ४५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. तसेच काही रखडलेल्या धीम्या लोकल जलद मार्गावरून धावत आहेत. त्यामुळे धीम्या लोकलच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, मंगळवारी कोणताही तांत्रिक बिघाड किंवा कोणती समस्या नसल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

Story img Loader