मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या परिसरात चांगला पाऊस पडत असून धरणांतील साठ्यात सोमवारी एका दिवसात २१ दिवसांच्या पाण्याची भर पडली. सातही धरणांमध्ये निम्म्याहून अधिक म्हणजेच ५३.१२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणीसाठा सोमवारी ५३.१२ टक्क्यांवर पोहोचला. जुलै महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सोमवारी पडलेल्या पावसामुळे सातही जलाशयांतील पाण्यात भरघोस वाढ झाली असून १९२ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असून धरणक्षेत्रातील डोंगरातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे धरणांतील साठ्यात भर पडत आहे.

Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Navi Mumbai Municipal Corporation has no choice but to devise new sources for water supply in next five years
वाढीव पाण्यासाठी प्रयत्नांची शर्थ; भीरा धरण, बारवीच्या पाण्यासाठी बैठकांचे सूतोवाच
Khadakwasla, Kirkatwadi water purification, pune health department
खडकवासला, किरकिटवाडीला शुद्धीकरणाविनाच पाणी !

हेही वाचा – मुंबई : मागाठाण्यात ठाकरे गटाला धक्का, दोन माजी नगरसेविका शिंदे शिवसेनेत

सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे. त्यातुलनेत सध्या सात धरणांत ७ लाख ६८ हजार ८४७ दशलक्ष लीटर पाणीसाठा जमा झाला आहे. सात जलशयांपैकी तुळशी तलाव कठोकाठ भरला आहे. सर्वात मोठे भातसा धरण ५२ टक्के भरले आहे. तर तानसा धरणदेखील ९१ टक्के भरले आहे.

सात धरणांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तर ठाणे,भिवंडी, निजामपूर मनपा क्षेत्रात दररोज १५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.

हेही वाचा – अन् तरुणाने मित्राच्या दिशेने फेकलेलं जॅकेट अडकलं रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर; चर्चगेट स्टेशनवरची घटना; गुन्हा दाखल!

पाणी कपात रद्द करण्यासाठी दबाव वाढणार ?

धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र आता धरणांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्यामुळे कपात रद्द करण्याची मागणी होऊ शकते किंवा राजकीय दबावही वाढू शकतो. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यास पाणीसाठा वाढणार नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन सावध भूमिका घेत आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा

उर्ध्व वैतरणा – १८, ४३ टक्के
मोडक सागर – ७५.४६ टक्के
तानसा – ९१. ५५ टक्के
मध्य वैतरणा – ४७.०३ टक्के
भातसा – ५२.०७ टक्के
विहार – ८८.४० टक्के
तुळशी – १०० टक्के

Story img Loader