मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईत चोख बंदोबस्त ठेवला असून सीआरपीसी कलम १४४ अंतर्गत आदेश जारी करण्यात आले आहेत. मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास मतदारांना बंदी घालण्यात आली आहे. याची कोटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा >>> इथेनॉलवरील निर्बंध केंद्राकडून मागे; तेल कंपन्यांकडून लवकरच खरेदी

centre approves salt pan lands for rehabilitation of ineligible under dharavi redevelopment project
अपात्र ‘धारावी’करांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; मिठागराची २५६ एकर जागा हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Roads Alibaug, MMRDA, Alibaug tourists,
अलिबागमधील दहा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणार, एमएमआरडीए ३२५ कोटी रुपये खर्च करणार, पर्यटकांना दिलासा
Nagpur, Bombay High Court, MSRDC, Nagpur Bench of Bombay High Court, Samruddhi mahamarg, vehicle inspections, Transport Department, Public Interest Litigation,
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….
Houses were inspected by the municipal health department to control dengue and chikungunya Nagpur
पाणी भरलेले भांडे उघडले की डासांच्या लाखो अळ्या…नागपुरातील ६.४४ लाख घरांत…
Monkeypox, monkeypox virus india,
सावधान! मंकीपॉक्स झपाट्याने पसरतोय… नागपुरातील ‘या’ रुग्णालयांत उपचाराची व्यवस्था
pmgp colony redevelopment issue in jogeshwari
‘पीएमजीपी’ वसाहत पुनर्विकासाकडे विकासकांची पाठ; निविदेस अनेकदा मुदतवाढ देऊनही शून्य प्रतिसाद
rural health, primary health centers, Maharashtra, dilapidated, dangerous, monsoon leaks, health department, doctor accommodation,
आरोग्य विभागाची २०० हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रें धोकादायक ! डॉक्टरांच्या निवासाची अवस्था दयनीय…

मुंबई शहर जिल्ह्यात २५२० मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल अथवा वायरल यंत्रणा नेण्यास बंदी आहे. याशिवाय परिसरात बॅनर, ध्वनिक्षेपक, मेगाफोनचा वापर करण्यासही बंदी आहे. पोलीस उपायुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला. २० मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील. याशिवाय मतदान केंद्र परिसरात मतदार व निवडणूक आयोगाचे अधिकारी वगळता इतर कोणीही व्यक्ती घुटमळणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

मोबाइल बंदी का?

मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्याबाबत सर्व पोलिसांना सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.