Manoj Jarange Patil Maratha Quota Rally Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी राजधानी मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कूच करत आहेत. मनोज जरांगे-पाटील २६ जानेवारीपासून आझाद मैदान आंदोलन करणार आहेत. पण, आझाद मैदानात आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी पोलिसांनी खारघर येथील मैदान सुचवलं आहे.

लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी वाहनांसह मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुंबईत दैनंदिन जनजीनव विस्कळीत होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांना आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. नवी मुंबईमधील खारगर येथील सेंट्रल पार्कमधील आंतरराष्ट्रीय मैदानाचा पर्याय पोलिसांनी आयोजकांना सुचवला आहे.

danger of accident prone areas in thane district also come to fore while accident season is starting
ठाण्यात अपघातप्रवण क्षेत्रांचा धोका, पूर्व द्रूतगती महामार्गावरील प्रत्येक चौकात अपघात क्षेत्र
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Image Of Supriya Sule.
Maharashtra News : खासदार सुप्रिया सुळे घेणार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट
Santosh Deshmukh murder case Ajit Pawar again consoles Dhananjay Munde  Mumbai news
पुरावे असल्याशिवाय कोणतीही कारवाई नाही; अजित पवारांचा धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा
Proposal for womens hostel in Taddeo finally submitted to state government
ताडदेवमधील महिला वसतिगृहाचा प्रस्ताव अखेर राज्य सरकारकडे
Thane , Eknath Shinde , Uddhav Thackeray group,
आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
Mora Mumbai Ro Ro service to be operational by March 2026
मोरा-मुंबई रो रो सेवा मार्च २०२६ पर्यंत कार्यान्वित; अनेक महिने बंद असलेले काम पुन्हा सुरू
Saif Ali Khan private security increased after attack Mumbai news
हल्ल्यानंतर सैफ व करीना दोघांनाही सुरक्षा; खासगी सुरक्षेतही वाढ

हेही वाचा : “जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर…”, मनोज जरांगेंनी मांडली पुढची भूमिका; मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला!

“जेवढे मुंबईचे हाल होणार, तेवढे आमचेही होत आहेत”

“आझाद मैदानावर व्यासपीठ उभे राहिलं आहे,” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे-पाटील यांनी दिली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कुठलाही संवाद झाला नाही. आम्हाला तोडगा काढायचा आहे. मज्जा करण्यासाठी मुंबईला आलो नाही. जेवढे मुंबईचे हाल होणार आहेत, तेवढं आमचेही हाल होत आहेत. दोघांचेही हाल होऊ द्यायचे नाही, हे सरकारच्या हातात आहे,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.

हेही वाचा : “एकदा मराठा आरक्षण मिळू द्या, आपल्याला विरोध करणाऱ्या एक एक नेत्याला…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

“आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: चर्चेस यावं, ही माझी विनंती आहे. आम्हाला मुंबईला येण्याची हौस नाही. अन्यथा आम्ही मुंबईकडे निघालो आहे. तिघांनी तोडगा काढावा,” असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

Story img Loader