मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘वडाळा – सीएसएमटी भुयारी मेट्रो ११’ मार्गिका मूळ संरेखनानुसार व्यवहार्य ठरत नसल्याने नवा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) १५ जूनपर्यंत नवीन आराखडा एमएमआरसीला सादर करणार आहे. प्रवासी संख्येच्या दृष्टीने ही मार्गिका व्यवहार्य ठरावी यासाठी संरेखनात बदल करण्यात येणार आहे. परिणामी, ही मार्गिका नेमकी कुठून कशी जाणार हे जूनमध्ये स्पष्ट होईल.

हेही वाचा : मुंबईत येत्या ३६ तासांत समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता, आयएमडी आणि आयएनसीओआयएसचा इशारा

Shilpata road remain closed five days February reconstruction work Nilaje railway flyover
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
navi Mumbai Due to rapid urbanization state government is exploring setting up integrated transport authority
महानगर प्रदेशात एकीकृत परिवहन प्राधिकरण वारे, राज्य सरकारकडून समिती स्थापन
mmrda invited tenders for direct access route from Badlapur to Mumbai reducing congestion
बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई काही मिनिटात, एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या प्रकल्प आराखड्यासाठी निविदा मागवल्या
Transport Minister Pratap Sarnaik urged creating role model for sustainable environment friendly development taking place at open space of ST
ST Bus Fare Hike : एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ, रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महागणार
Mumbai, Traffic changes at BKC, traffic congestion,
मुंबई : बीकेसी येथे वाहतुकीत बदल, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतुकीत बदल
Rehabilitation of one lakh 41 thousand huts on central government land by 2030
केंद्र सरकारच्या जमिनीवरील एक लाख ४१ हजार झोपड्यांचे २०३० पर्यंत पुनर्वसन
Scam in contract bus process Inquiry committee recommends to Chief Minister to cancel tender Mumbai new
एसटी बस निविदेत घोटाळा नव्याने प्रक्रिया राबविण्याची शिफारस; मुख्यमंत्र्यांचे निर्णयाकडे लक्ष

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो ११’ मार्गिकेच्या उभारणीची जबाबदारी राज्य सरकारने एमएमआरसीकडे दिली आहे. आधी ‘एमएमआरसी’ मेट्रो ११ ची उभारणी करणार होती. या मार्गिकेची जबाबदारी आल्यानंतर ‘एमएमआरसी’ने तिच्या अंमलबजावणीचे काम हाती घेतले. मात्र ‘एमएमआरसी’च्या मूळ आराखड्यानुसार ही मार्गिका प्रवासी संख्येच्या दृष्टीने व्यवहार्य ठरत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या मार्गिकेचा नव्याने आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

Story img Loader