मुंबई : ऑगस्ट महिन्यात दडी मारणाऱ्या पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत जोर धरल्याने करपून चाललेल्या खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अवर्षणामुळे पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या जिल्ह्यांतील धरणक्षेत्रांत चांगला पाऊस होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली तर, नाशिकमधील अनेक धरणे तुडुंब झाल्याने विसर्ग सुरू झाला.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठय़ात गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे तीन टक्क्यांची वाढ झाली असून तो ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. भातसा धरणाची पाणी पातळी शुक्रवारी सकाळी ८ वाजता १४०.२४ मीटरवर पोहोचली होती.

Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’; १० मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्काराने गौरव
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
radhakrishna vikhe patil statement on baramati district creation
बारामती स्वतंत्र जिल्हा निर्मितीची अफवा; राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
Edible oil imports increase by 16 percent What was the impact of the increase in palm oil prices Mumbai print news
खाद्यतेलाच्या आयातीत १६ टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या, पामतेलाच्या दरवाढीचा परिणाम काय झाला
Pune-Nashik railway , old route, Mahayuti,
पुणे-नाशिक रेल्वे जुन्याच मार्गावरून हवी, विरोधकांसह महायुतीच्या लोकप्रतिनिधींचीही मागणी

हेही वाचा >>>जयस्वाल यांच्या नियुक्तीविरोधातील याचिका फेटाळली

अन्यत्र हलक्या सरी

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरींनी शेतकरी वर्गाला दिलासा दिला आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा वाढलेला वेग, मध्य भारतावर असलेला कमी दाबाचा पट्टा, दक्षिणेकडे सरकलेला मोसमी पावसाचा आस, या पोषक स्थितीमुळे राज्यात पाऊस पडतो आहे. पुढील ४८ तास मोसमी पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. रविवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

Story img Loader