मुंबई : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत प्रथम सत्र पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे मूल्यांकन करून संबंधित परीक्षांचे लेखी, प्रात्यक्षिक, तोंडी आदी विविध अंतर्गत व बाह्यमूल्यमापनाचे गुण ‘ई – समर्थ’ संकेतस्थळाद्वारे विद्यापीठाकडे सादर करण्यास मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांकडून वारंवार विलंब होत आहे. सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांकडून विलंब होत असल्यामुळे मुंबई विद्यापीठाला निकाल जाहीर करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व महाविद्यालयांना आता २० फेब्रुवारीपर्यंत शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर देखील ही प्रक्रिया महाविद्यालयांनी पूर्ण केली नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिल्यास महाविद्यालय जबाबदार राहील, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा