मुंबई : वैयक्तिक माहिती भरल्यानंतर अर्ज अवैध दाखविणे, लिंक व्यवस्थित सुरू न राहणे आणि अभ्यासक्रमाचे नावच न दाखविणे अशा अडचणींना विधि शाखेच्या नवव्या सत्र परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज भरताना सामोरे जावे लागत आहे. आधी अर्ज अवैध दिसत होता, आता लिंकच दिसत नाही. ही लिंक कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही स्पष्टता मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून दिली गेली नसल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत.

मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत पाचवे वर्ष विधि शाखा (पाच वर्षीय अभ्यासक्रम) नवव्या सत्राची परीक्षा ५ ते १४ डिसेंबर २०२३ या कालावधीत घेतली होती. कोणत्याही परीक्षेचा निकाल ४५ दिवसांत जाहीर होणे अपेक्षित आहे. असे असताना या परीक्षेचा निकाल तब्बल १११ दिवसांनी ३ एप्रिल २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर संकेतस्थळावर विधि शाखेसाठी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज भरण्याची मुदत १४ एप्रिलपर्यंत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु त्यानंतर विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु विधि शाखेच्या नवव्या सत्र परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनासाठीची लिंक कधी सुरू होणार, याबाबत कोणतीही स्पष्टता विद्यापीठ प्रशासनाकडून दिली गेली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. दरम्यान, ‘प्रत्येक अभ्यासक्रमासाठीचा प्रोग्रॅम कोड हा वेगळा असतो. सध्या सुरू असलेली लिंक ही विधि शाखेच्या दुसऱ्या परीक्षेची आहे. विधि शाखेच्या नवव्या सत्र परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाची लिंक अद्याप सुरू झालेली नाही. ती लवकरच सुरू करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी गोंधळून जाण्याचे कारण नाही’, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले.

SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
Reserve Bank application for Aviom bankruptcy proceedings
‘एव्हिओम’च्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठी रिझर्व्ह बँकेचा अर्ज
SEBI
सेबीकडून चार Stock Brokers ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द, जाणून घ्या तुमच्याही ब्रोकरचा आहे का समावेश?
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
Changes in the format of the NEET question paper
‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल
number of Guillain Barre Syndrome GBS patients in state has reached 101 of which 16 patients are on ventilators
‘जीबीएस’ग्रस्त गावांना शुद्ध पाणी कठीणच? वाढीव कोटा मंजूर नसल्याने प्रश्न; महापालिका-जलसंपदा विभागात वाद

हेही वाचा : चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!

‘विधि शाखा परीक्षेच्या निकालाच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज भरताना संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती भरल्यानंतर अर्ज अवैध दाखवितात. तर आता अभ्यासक्रमाचे नाव व लिंकच दिसत नाही. फक्त उन्हाळी किंवा हिवाळी सत्र असेच पर्याय दिसत आहेत. विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ पुनर्मूल्यांकनासाठीची लिंक सुरू करावी. तसेच पुनर्मूल्यांकनाचा निकालही वेळेत जाहीर करावा’, अशी मागणी एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर केली.

Story img Loader