मुंबई : मुंबईत रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती असून, किमान तापमानाचा पारा शनिवारी २१.४ अंश सेल्सिअसवर होता. तर कमाल तापमानात चढ – उतार सुरूच आहे. मागील दोन दिवस मुंबईच्या कमाल तापमानात घट झालेली आहे. मात्र, किमान तापमानाचा पारा सध्या चढा असल्याने पहाटे किंचीतसा गारवा असतो.

हेही वाचा >>> पालिकेतील कामगार संघटनाच्या समन्वय समितीने केला स्वाक्षरीचा दुरुपयोग; आघाडीला परस्पर पाठिंबा जाहीर केल्यामुळे अन्य संघटना नाराज

Patients of cold cough fever in every house of Nagpur
नागपुरात घरोघरी सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण… तापमान बदलामुळे…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India Climate Change Inflation Agriculture Farmers
व्यवसायाभिमुख पिके हवीत!
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mumbai temprature today
Mumbai Temprature: मुंबईत तापमान सामान्य पातळीच्याही खाली, पण गारवा अल्पकाळासाठीच; वाचा काय आहे हवामान विभागाचा अंदाज!

मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाडा अशा हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. कमाल तापमानात घसरण होत असली तरी किमान तापमानाचा पारा अजूनही चढाच आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ३३.३ तर सांताक्रूझ केंद्रात ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर दोन्ही केंद्रावरील किमान तापमान अनुक्रमे २३.२ आणि २०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. सध्या मुंबईत कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने चढ उतार सुरू आहे. त्यामुळे कधी पहाटे गारवा असतो तर दिवसा उकाडा जाणवतो. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस मुंबईतील तापमानात फारसा फरक पडणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच मध्येच कमाल आणि किमान तापमानात अचानक घट होईल किंवा अचानक वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा १२ अंशाखाली घसरला आहे. दरम्यान, रविवारनंतर संपूर्ण राज्यात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Story img Loader